शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात ६५ घरांचे पिण्याचे पाणी रोखले

By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST

भातगावमधील प्रकार : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

गुहागर : तालुक्यातील भातगाव धक्का येथील सुमारे ६५ घरांना पाणी पुरवठा होत असलेल्या नदीवर खासगीरित्या बांध घालून पाणीपुरवठा रोखण्यात आला आहे. याप्रकरणी पुरुषोत्तम गणेश करमरकर यांच्या विरोधात ग्रामस्थांनी गुहागरच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून सभापती राजेंद्र बेंडल यांनी ग्रामस्थांची तहसीलदारांबरोबर चर्चा घडवून आणली. तहसीलदार पाटील यांनी मंडल अधिकारी वरवडेकर यांना तातडीने पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भातगाव धक्का येथे ब्राह्मण, मराठा, कुणबी समाजातील सुमारे ६५-७० घरांमधून सुमारे १५० लोकवस्ती आहे. नळपाणी योजेनतील पंप नादुरुस्तीमुळे गावातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून ग्रॅव्हिटीने पाणी घेऊन ग्रामस्थ आपली तहान भागवत होते. गावातील पुरुषोत्तम गणेश करमरकर यांच्या जागेतून वाहणाऱ्या या नदीच्या उंचावरील भागातून करमरकर कुटुंबीय पूर्वापार पाटाचे पाणी उचलत होते. त्यांची पिण्याची गरज भागून नदीत वाहून जाणारे पाणीच सुमारे १५० ग्रामस्थांनी आपल्यासाठी वळवले होते. मात्र, करमरकर यांनी आपल्याला पुरेपूर पाणी मिळत असूनही वाहून जाणाऱ्या पाण्यावर पुन्हा बांध घालून ग्रामस्थांचे पाणी पळवले असल्याचे भातगाव येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.दरम्यान, वैयक्तिक कामासाठी आलेल्या करमरकर यांना तहसीलदार पाटील यांनी बोलावून घेतले. नैसर्गिक जलस्त्रोतांवर कोणाचीही मालकी नसल्याचे त्यांनी करमरकर यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदी माझ्याच जमिनीतून जाते, त्यामुळे पाणी माझे आहे, असा अट्टाहास करमरकर यांनी धरल्याचे पुढे आले आहे. मंडल अधिकारी उद्या प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहणी करतील. त्यांच्या अहवालानुसारच कार्यवाही होईल. परंतु नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळणारे पाणी कुणालाही खासगीरित्या रोखता येणार नाही, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)