शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘शिक्षण’कडे ६० लाख रुपये पडून

By admin | Updated: December 14, 2014 00:04 IST

सदस्य संतप्त : शाळा दुरूस्ती व कंपाऊंड वॉलची कामे रखडली

रत्नागिरी : जिल्हा नियोजन योजनेंर्गत आलेले ६० लाख रुपये धोरणात्मक शासन निर्णय उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉलची शेकडो कामे रखडली आहेत़ निधी आलेला असतानाही शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामाच्या याद्या तयार करण्यास उशिर झाल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा मोडकळीस आल्याने त्या धोकादायक स्थितीत आहेत़ मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोकादायक ठरु शकतात़ त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शाळा दुरुस्तीच्या मागणीला जोर धरला आहे़ त्यातच जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजार प्राथमिक शाळांना कंपाऊंड वॉल नाही़ शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ६० लाख रुपयांचा निधी आलेला आहे़शिक्षण समितीच्या मागील सभांमध्ये शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉल बांधकामासाठी निधी आलेला असताना त्यांच्या परिपूर्ण प्रस्तावांची यादी का तयार करण्यात आलेली नाही, असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला होता़ त्याबाबत सदस्यांकडून प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात येत होते़ जिल्हा नियोजनकडून आलेला ६० लाख रुपयांचा निधी पडून राहण्यास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत होता़ शाळा दुरुस्ती व कंपाऊंड वॉलची कामांच्या प्रस्तावांच्या अंतिम याद्या उशिरा का होईना त्या तयार करण्यात आल्या आहेत़ मात्र, हा निधी खर्च करण्यासाठी ज्या प्रशासकीय नियमांचे मार्गदर्शक सूचनांचे धोरणात्मक शासन निर्णय जिल्हा परिषदेला अजूनही मिळालेला नाही़ त्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा नियोजन समितीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ मात्र, त्याबाबत हा निधी खर्च करण्याबाबत जिल्हा नियोजनकडून अद्याप शासन निर्णय प्राप्त न झाल्याने हा निधी जिल्हा परिषदेकडून पडून आहे़ त्यामुळे शासन निर्णय केव्हा येणार आणि निधी कधी खर्च करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शाळा दुरूस्ती व संरक्षण भिंत या दोन महत्वाच्या विषयांवरील अंतिम प्रस्तावाच्या याद्या तयार करण्यात आल्या असल्याने आता पुढील निर्णयाकडे लक्ष आहे. (शहर वार्ताहर)