शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

गुहागर नगरपंचायतीची ५० टक्क्यांनी करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

असगोली : गुहागर नगरपंचायतीने मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये ५० टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे, तर वीज कर तिप्पट आणि ...

असगोली : गुहागर नगरपंचायतीने मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये ५० टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे, तर वीज कर तिप्पट आणि इतर आकार दुपटीने वाढविला आहे. या वाढवलेल्या करामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या शहरवासीयांना ही करवाढ अधिकच त्रासदायक ठरणार आहे.

गुहागर नगरपंचायत स्थापनेपासून तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली तरी आम्ही कोणतीही करवाढ करणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्या पद्धतीने त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत कोणतीही करवाढ केली नाही. दुसऱ्या टर्ममध्ये आमदार जाधव यांच्या हातातून गुहागर नगरपंचायत निसटली. शहर विकास आघाडी व इतर सर्व पक्ष मिळून कारभार चालवणाऱ्या गुहागर नगरपंचायतीने आपल्या कार्यकाळाच्या तीन वर्षांनंतर ५० टक्क्यांनी करवाढ केली आहे. मालमत्ता करामध्ये व पाणीपट्टी करांमध्ये पन्नास टक्के वाढ केली आहे. वीजकरांमध्ये तिपटीने वाढ केली आहे. ज्या ठिकाणी वीजकर तीस रुपये होता, त्या ठिकाणी शंभर रुपये करण्यात आला आहे, तर इतर आकार दुपटीने म्हणजे ज्या ठिकाणी शंभर रुपये होता त्या ठिकाणी दोनशे रुपये करण्यात आला आहे. ही करवाढ सर्वानुमते जनरल सभेतून करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिली.

कर्मचाऱ्यांचे पगार भागविताना शासनाकडून सहायक अनुदान येत नाही. यामुळे नगरपंचायत निधीवर आर्थिक भार पडत असल्याने ही करवाढ करणे आवश्यक ठरल्याचे राजेश बेंडल यांनी सांगितले. आजपर्यंत नगरपंचायतीने कोणतीच करवाढ केली नाही. मात्र भविष्याचा वेध घेता ही करवाढ करणे आवश्यक होती, असेही ते म्हणाले. आजपर्यंत शासनाकडून विजेचे बिल, पंपाचे मीटर बिल मिळत आहे. मात्र भविष्यात हे मिळेल की नाही याची शंका आहे. नगरपंचायत निधीमधून कोणतीच विकासकामे घेतली जात नाहीत. कर्मचाऱ्यांचा पगार भागवण्यासाठी साहाय्यक अनुदान येत नसल्याने दर महिन्याला सव्वा लाख रुपयाचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परिणामी हा खर्च नगरपंचायत निधीतून दिला जात आहे. एकूण सर्व प्रकारच्या करामधून चाळीस लाख रुपये कर रक्कम जमा होते. ही करवाढ केल्याने इतर खर्च करण्याकरता थोडा तरी दिलासा मिळणार आहे.

या नगरपंचायत निधीमधून महिला बालकल्याण, अपंग निधी व मागासवर्गीय निधी बाजूला ठेवावा लागतो. यासाठी गुहागर नगरपंचायतीला ही करवाढ करणे आवश्यक वाटले, गतवर्षी करवाढ करण्यात येणार होती, मात्र कोरोनामुळे करवाढ केली नाही. यामुळे जानेवारी २०२१ मध्ये जनरल सभेतून सर्वानुमते करवाढीचा निर्णय घेण्यात आला. याप्रमाणे सन २०२१-२२ या वर्षाकरिता ही करवाढ लागू झाली आहे, असे ते म्हणाले.