शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

गुहागर नगरपंचायतीची ५० टक्क्यांनी करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

असगोली : गुहागर नगरपंचायतीने मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये ५० टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे, तर वीज कर तिप्पट आणि ...

असगोली : गुहागर नगरपंचायतीने मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये ५० टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे, तर वीज कर तिप्पट आणि इतर आकार दुपटीने वाढविला आहे. या वाढवलेल्या करामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या शहरवासीयांना ही करवाढ अधिकच त्रासदायक ठरणार आहे.

गुहागर नगरपंचायत स्थापनेपासून तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली तरी आम्ही कोणतीही करवाढ करणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्या पद्धतीने त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत कोणतीही करवाढ केली नाही. दुसऱ्या टर्ममध्ये आमदार जाधव यांच्या हातातून गुहागर नगरपंचायत निसटली. शहर विकास आघाडी व इतर सर्व पक्ष मिळून कारभार चालवणाऱ्या गुहागर नगरपंचायतीने आपल्या कार्यकाळाच्या तीन वर्षांनंतर ५० टक्क्यांनी करवाढ केली आहे. मालमत्ता करामध्ये व पाणीपट्टी करांमध्ये पन्नास टक्के वाढ केली आहे. वीजकरांमध्ये तिपटीने वाढ केली आहे. ज्या ठिकाणी वीजकर तीस रुपये होता, त्या ठिकाणी शंभर रुपये करण्यात आला आहे, तर इतर आकार दुपटीने म्हणजे ज्या ठिकाणी शंभर रुपये होता त्या ठिकाणी दोनशे रुपये करण्यात आला आहे. ही करवाढ सर्वानुमते जनरल सभेतून करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिली.

कर्मचाऱ्यांचे पगार भागविताना शासनाकडून सहायक अनुदान येत नाही. यामुळे नगरपंचायत निधीवर आर्थिक भार पडत असल्याने ही करवाढ करणे आवश्यक ठरल्याचे राजेश बेंडल यांनी सांगितले. आजपर्यंत नगरपंचायतीने कोणतीच करवाढ केली नाही. मात्र भविष्याचा वेध घेता ही करवाढ करणे आवश्यक होती, असेही ते म्हणाले. आजपर्यंत शासनाकडून विजेचे बिल, पंपाचे मीटर बिल मिळत आहे. मात्र भविष्यात हे मिळेल की नाही याची शंका आहे. नगरपंचायत निधीमधून कोणतीच विकासकामे घेतली जात नाहीत. कर्मचाऱ्यांचा पगार भागवण्यासाठी साहाय्यक अनुदान येत नसल्याने दर महिन्याला सव्वा लाख रुपयाचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परिणामी हा खर्च नगरपंचायत निधीतून दिला जात आहे. एकूण सर्व प्रकारच्या करामधून चाळीस लाख रुपये कर रक्कम जमा होते. ही करवाढ केल्याने इतर खर्च करण्याकरता थोडा तरी दिलासा मिळणार आहे.

या नगरपंचायत निधीमधून महिला बालकल्याण, अपंग निधी व मागासवर्गीय निधी बाजूला ठेवावा लागतो. यासाठी गुहागर नगरपंचायतीला ही करवाढ करणे आवश्यक वाटले, गतवर्षी करवाढ करण्यात येणार होती, मात्र कोरोनामुळे करवाढ केली नाही. यामुळे जानेवारी २०२१ मध्ये जनरल सभेतून सर्वानुमते करवाढीचा निर्णय घेण्यात आला. याप्रमाणे सन २०२१-२२ या वर्षाकरिता ही करवाढ लागू झाली आहे, असे ते म्हणाले.