शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पंतप्रधान पीक विमा योजनेत यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा ...

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गतवर्षी केवळ १,३०० शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेतला हाेता. मात्र, यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची वाढ झाली असून, या याेजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

शासनाने खरीप हंगाम २०२१साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. भातासाठी एका हेक्टरला ४५,५०० रूपये तर नाचणीसाठी २० हजार रूपये विमा संरक्षित रक्कम जाहीर केली आहे. हवामानातील घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी योजना जाहीर केली आहे.

दोन वर्षांपूर्वी भात कापणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हा प्रथमच रत्नागिरीतील शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला होता. गतवर्षी जिल्ह्यातील १,३०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पावसामुळे बाधित झालेल्या अडीचशे शेतकऱ्यांना १४ लाख रूपयांचा परतावा मिळाला होता.

कोकणात भाताचे उंबरठा उत्पादन ७० टक्केपेक्षा जास्त असल्याने विमा परताव्यापासून शेतकरी वंचित राहात होते. आता लागवडीपासून कापणीनंतरचे नुकसान ग्राह्य धरले जाणार असल्याने विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची वाढ होऊ शकते. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना विमा योजनेसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

-----------------------------

हवामानातील बदलामुळे प्रतिकूल परिस्थिती उद्भवत असल्याने पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षात पावसाळा लांबल्यामुळे भात कापणीवेळी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा उतरवणे आवश्यक आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

----------------------------

विमा योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी

तालुका शेतकरी

मंडणगड ३५७

दापोली १७१

खेड १३७

गुहागर १३९

चिपळूण १३६

संगमेश्वर २५८

रत्नागिरी ५४४

लांजा ६९

राजापूर ६९