शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
2
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
3
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
4
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
5
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
6
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
7
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
8
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
9
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
10
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
11
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
12
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
13
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
14
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
15
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
16
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
17
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
18
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
19
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
20
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

पंतप्रधान पीक विमा योजनेत यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा ...

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गतवर्षी केवळ १,३०० शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेतला हाेता. मात्र, यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची वाढ झाली असून, या याेजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

शासनाने खरीप हंगाम २०२१साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. भातासाठी एका हेक्टरला ४५,५०० रूपये तर नाचणीसाठी २० हजार रूपये विमा संरक्षित रक्कम जाहीर केली आहे. हवामानातील घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी योजना जाहीर केली आहे.

दोन वर्षांपूर्वी भात कापणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हा प्रथमच रत्नागिरीतील शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला होता. गतवर्षी जिल्ह्यातील १,३०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पावसामुळे बाधित झालेल्या अडीचशे शेतकऱ्यांना १४ लाख रूपयांचा परतावा मिळाला होता.

कोकणात भाताचे उंबरठा उत्पादन ७० टक्केपेक्षा जास्त असल्याने विमा परताव्यापासून शेतकरी वंचित राहात होते. आता लागवडीपासून कापणीनंतरचे नुकसान ग्राह्य धरले जाणार असल्याने विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची वाढ होऊ शकते. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना विमा योजनेसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

-----------------------------

हवामानातील बदलामुळे प्रतिकूल परिस्थिती उद्भवत असल्याने पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षात पावसाळा लांबल्यामुळे भात कापणीवेळी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा उतरवणे आवश्यक आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

----------------------------

विमा योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी

तालुका शेतकरी

मंडणगड ३५७

दापोली १७१

खेड १३७

गुहागर १३९

चिपळूण १३६

संगमेश्वर २५८

रत्नागिरी ५४४

लांजा ६९

राजापूर ६९