शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान पीक विमा योजनेत यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा ...

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गतवर्षी केवळ १,३०० शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेतला हाेता. मात्र, यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची वाढ झाली असून, या याेजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

शासनाने खरीप हंगाम २०२१साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. भातासाठी एका हेक्टरला ४५,५०० रूपये तर नाचणीसाठी २० हजार रूपये विमा संरक्षित रक्कम जाहीर केली आहे. हवामानातील घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी योजना जाहीर केली आहे.

दोन वर्षांपूर्वी भात कापणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हा प्रथमच रत्नागिरीतील शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला होता. गतवर्षी जिल्ह्यातील १,३०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पावसामुळे बाधित झालेल्या अडीचशे शेतकऱ्यांना १४ लाख रूपयांचा परतावा मिळाला होता.

कोकणात भाताचे उंबरठा उत्पादन ७० टक्केपेक्षा जास्त असल्याने विमा परताव्यापासून शेतकरी वंचित राहात होते. आता लागवडीपासून कापणीनंतरचे नुकसान ग्राह्य धरले जाणार असल्याने विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची वाढ होऊ शकते. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना विमा योजनेसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

-----------------------------

हवामानातील बदलामुळे प्रतिकूल परिस्थिती उद्भवत असल्याने पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षात पावसाळा लांबल्यामुळे भात कापणीवेळी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा उतरवणे आवश्यक आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

----------------------------

विमा योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी

तालुका शेतकरी

मंडणगड ३५७

दापोली १७१

खेड १३७

गुहागर १३९

चिपळूण १३६

संगमेश्वर २५८

रत्नागिरी ५४४

लांजा ६९

राजापूर ६९