शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला, चौघांचा मृत्यू; आतापर्यंत किती मिळाली भरपाई.. वाचा

By संदीप बांद्रे | Updated: March 19, 2025 13:50 IST

तर १५ गंभीर जखमी

संदीप बांद्रेचिपळूण : गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चाैघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर, तर एकजण किरकाेळ जखमी झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ काेटी ०९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.वर्ष २०२२-२३ मध्ये रानगव्याने केलेल्या हल्ल्यात सतीश शांताराम जाधव (रा. फुरूस), भिकाजी राघू माडवकर (रा. माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (रा. तळसर, चिपळूण) यांचा मृत्यू झाला. तर अरुण रेडीज (रा. चांदेराई, रत्नागिरी) यांचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

सह्याद्री खोऱ्यातील पातेपिलवलीतर्फ वेळंब, शेवरवाडी-नांदगाव, खानू-नवीवाडी व फुरूस (ता. दापाेली), पन्हाळकाजी व ताडील (ता. दापाेली), चिंचघर-खेड, तळसर-चिपळूण, चांदेराई व पाथरट (ता. रत्नागिरी), दोडवली-गुहागर, साखरपा संगमेश्वर या ठिकाणी वन्यप्राण्यांनी माणसांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू नाहीबिबट्या, रानगवा, रानडुक्कर, अस्वल, माकड व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, रानगवा, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला.

डेरवण येथे उपचार सुरूतोंडली-वारेली (ता. चिपळूण) गावच्या सीमेवर शनिवारी मध्यरात्री घरात घुसून बिबट्याने आशिष महाजन यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, डेरवण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय वन्यप्राण्यांकडून हल्ला होत नाही. वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १९२६ हा चोवीस तास कार्यरत असून, त्याची मदत घ्यावी. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचता येते. - गिरिजा देसाई, विभागीय वनअधिकारी, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग