शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
5
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
6
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
7
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
8
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
9
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
10
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
11
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
12
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
13
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
14
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
15
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
16
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
17
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
18
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
19
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
20
वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
Daily Top 2Weekly Top 5

४४ दिवसांनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन मागे : तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:34 IST

निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना

ठळक मुद्देआचारसंहितेनंतर पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन

रत्नागिरी : निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिले. या आश्वासनानंतर १२ फेब्रुवारी २०१९पासून सुरू असलेले आंदोलन अखेर ४४ दिवसानंतर मागे घेण्यात आले.

जिल्ह्यातील गडनदी, कोयना प्रकल्प, चांदोली अभयारण्यासह विविध प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांचे गेले ४४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यातील गडनदी, कोयना प्रकल्पासह अन्य प्रकल्पासंदर्भातील जिल्हा प्रशासनाशी संबंधित सर्व मागण्या यापूर्वीच मान्य झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीही सुरू झाली आहे. ज्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर सोडवणे अपेक्षित होते, त्यासंदर्भातही मंत्रालयात २० मार्च २०१९ रोजी बैठक होऊन प्रकल्पग्रस्तांबाबतचे समाधानकारक निर्णयही झाले. हे निर्णय आचारसंहिता झाल्यानंतर एका मेळाव्यामध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून घोषित केले जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी (२३ मार्च रोजी) हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, या प्रकल्पग्रस्तांमध्ये जे चांदोली अभयारण्याशी संबंधित प्रकल्पग्रस्त होते त्यांची संकलन यादी अद्याप जिल्हा प्रशासनाकडून पूर्णच झालेली नाही. आंदोलनानंतर नव्याने यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. या यादीवर सही होत नाही तोपर्यंत किंवा यादी मिळण्याची निश्चित मुदत असलेले पत्र प्रशासनाकडून मिळेत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला.

याबाबत सोमवारी आंदोलनकर्त्यांची संबंधित अधिकाऱ्यांशी दुपारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आंदोलनकर्ते बैठकीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठकच होऊ न शकल्याने आंदोलनकर्त्यांना कोणताच निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे सोमवारीदेखील हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, मंगळवारी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या दालनात सकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला दलाचे जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStrikeसंप