शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांकडील काजूसाठी शेतमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...

रत्नागिरी : काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांकडील काजूसाठी शेतमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येते. बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण ठेवण्यात आले आहे. बाजारातील दराच्या ७५ टक्क्यांप्रमाणे काजू बीसाठी ८५ रुपये प्रमाणे ३२ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात काजू उत्पादनामुळे दीड ते दोन कोटींचे अर्थार्जन प्राप्त होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. शेतकऱ्यांकडे काजू पीक शेतमाल साठवणुकीच्या सुविधा नसतात. एकाचवेळी काजू बी बाजारात आली तर दर कोसळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना काजू बी तारण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षी लॉकडाऊन काळात काजू बीचे दर घसरलेले होते. बाजार समितीने ५६ रुपये किलोने तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्ज दिले होते ९३ टन काजू बी तारण ठेवण्यात येऊन ५३ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी काजू बीची विक्री केली असता किलोला १२० ते १३० रुपये किलो दर प्राप्त झाला होता. अडीचपट दर प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. यावर्षीही शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यातच तारण योजनेचा प्रारंभ झाला असून, लांजा येथील शेतकऱ्यांनी ३७ टन काजू तारण ठेवला असून त्यांना ३२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सध्या बाजारात काजू बीचा दर ११४ रुपये असून शेतमाल तारण योजनेंतर्गत ७५ टक्के दराप्रमाणे कर्जाची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

कोट

काजू बी तारण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी गोडाऊनपर्यंत माल घेऊन यावे लागत होते. मात्र, आता शेतकऱ्यांच्या शेताजवळच माल साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

- संजय आयरे, सभापती, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी.