शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 13:17 IST

सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्यांचे आधारक्रमांक संलग्न

रत्नागिरी : सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ८० हजार ३७८ लोकसंख्येपैकी ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात आले आहेत. हे काम केवळ ३७ टक्के इतकेच झाले आहे.सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा, तसेच पात्र व्यक्तींनाच याचा लाभ व्हावा या उद्देशाने शासनाच्या पुरवठा विभागाकडून २०१२पासून शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे बनावट शिधापत्रिकांना चांगलाचा चाप बसला आहे. या मोहिमेनंतर शिधापत्रिकेवरील धान्य योग्य व्यक्तींनाच मिळावे, या हेतूने शासनाने शिधापत्रिकेवरील सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकांशी जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. सध्या अंत्योदय आणि प्राधान्य गटालाच सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा लाभ मिळत आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकाला शिधापत्रिकेवर नमूद केल्याप्रमाणे धान्य वितरण केले जाते. तर राष्ट्रीय धान्य सुरक्षा योजनेत समावेश असलेल्या प्राधान्य गटाला शिधापत्रिकेवरील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य धान्य देण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१४पासून घेण्यात आला आहे.प्राधान्य गटातील शिधापत्रिकेवरील एका तरी सदस्याचे आधारकार्ड संलग्न करण्याची सवलत सुरूवातीच्या काळात देण्यात आली होती. हे काम सुमारे ९० टक्के इतके पूर्णही झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक सदस्यांचे आधार संलग्न करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार २०३ शिधापत्रिकेवरील ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्य आधार संलग्न करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आधारशी संलग्न झालेल्या सदस्यांची संख्या कमी आहे. शिधापत्रिकेवरील सर्व सदस्य आधारशी संलग्न न झाल्यास त्या शिधापत्रिकेवरील धान्य वितरण थांबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.चौकटआधार मशीनची संख्या कमीआधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्याचे कामी हाती घेण्यात आले असले तरी १२ वर्षाखालील मुल आणि ६० वर्षावरील ज्येष्ठांचे ठसे घेण्यात अडचणी येत आहेत. त्यातच जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी आधार मशीन सुरू असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRatnagiriरत्नागिरी