शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

३३ केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड, रत्नागिरीकर अंधारात; कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने वीज पुरवठा पूर्ववत

By मेहरून नाकाडे | Updated: June 16, 2023 15:33 IST

रत्नागिरी : रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बिघाड झाला व शहराला विद्युत पुरवठा करणारी ...

रत्नागिरी : रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बिघाड झाला व शहराला विद्युत पुरवठा करणारी ३३/११ केव्ही हार्बर व राहटाघर ही दोन उपकेंद्रे दि.१३ जून रोजी रात्री ९.३० वाजता बंद पडली. शहरातील ३५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला. याबाबतची सूचना उपकेंद्रातील यंत्रचालकाने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना दिली. तात्पुरती उपाययोजना करून रत्नागिरी शहर शाखाधिकारी कौस्तुभ वासावे यांनी पर्यायी विद्युत वाहिनीद्वारे २० मिनिटांच्या आत वीज पुरवठा पुर्ववत करून ग्राहकांना दिलासा दिला.मात्र वीजपुरवठा वारंवार चालू-बंद होत असल्याने बिघाड शोधून दुरूस्ती करणे आवश्यक होते. त्यासाठी काैस्तुभ वासावे यांनी सहकारी जनमित्रांना घेत ३३ केव्ही विद्युत वाहिनीवरील बिघाड शोधण्यासाठी रात्रीची गस्त सुरु केली. अंधार, मुसळधार पाऊस अशा परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांची रत्नागिरीतल्या खालची आळी भागात हार्बर उपकेंद्र ते कुवारबाव उपकेंद्र या ३३ केव्ही विद्युत वाहिनीची गस्त सुरु होती. रात्रीची वेळ व कमी मनुष्यबळ असल्याने त्यांनी एमआयडीसी शाखाधिकारी गणेश पखवाने व शिरगांव शाखाधिकारी राम बोबडे यांच्याकडे सहकार्य मागितले. तातडीने दोघेही जनमित्रांसह मदतीला धावले. त्यावेळी क्रांतीनगरजवळील विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड सापडला मात्र दोन वाहिन्या एकाच खांबावर असल्याने तो दुरूस्त करण्यासाठी शिरगाव उपकेंद्राचा विद्युत पुरवठा बंद करावा लागणार होता. शिवाय १३ मीटर उंचीचा वीजखांब, त्यावर चढून काम करणे कठीण होते. रात्री साडेबारा वाजता दुरूस्तीचे काम सुरू झाले. वीज खांबावर चढलेल्या रुपेश लांबे व मुकूंद चितळे, रवी विटकर, सत्यजित सणगरे यांनी विशेष परिश्रम घेत नादुरूस्त पिन इन्सुलेटर बदलून रात्री सव्वा एक वाजता तिन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत केला. ३५ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा उजेड आला. उजेड पेरणाऱ्या या वीज कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र वीज पुरवठा खंडित झालेनंतर नेमकी समस्या ओळखून वीजपुरवठा पूर्ववत करणे कसोटी असते. पावसाळ्यात तर जोखीम घेत जबाबदारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजmahavitaranमहावितरण