शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षक दलाच्या जवानांचा ‘एक तास’ स्वच्छतेसाठी, २५० किलो कचरा गोळा 

By शोभना कांबळे | Updated: October 2, 2023 16:39 IST

रत्नागिरी : येथील भारतीय तटरक्षक दलातर्फे रविवारी (१ ऑक्टाेबर) भगवती बंदर, रत्नदुर्ग परिसर व मांडवी समुद्रकिनारी येथे ‘स्वच्छता हीच ...

रत्नागिरी : येथील भारतीय तटरक्षक दलातर्फे रविवारी (१ ऑक्टाेबर) भगवती बंदर, रत्नदुर्ग परिसर व मांडवी समुद्रकिनारी येथे ‘स्वच्छता हीच सेवा’ ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता माेहीम हाती घेतली हाेती. या माेहिमेंतर्गत २५० किलो कचरा गाेळा करण्यात आला आहे. हा कचरा नगर परिषदेच्या कचरा गाड्यांमध्ये टाकण्यात आला.स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर उपमहानिरीक्षक शत्रुजीत सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित स्वयंसेवकांनी स्वच्छतेची प्रतिज्ञाही घेतली. या कार्यक्रमात शिरगाव (ता. रत्नागिरी) मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाचे असोसिएटेड डीन डॉ. सुरेश नाईक, सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त राजकुमार कोळीपाका, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी रत्नागिरीचे एचआर व्यवस्थापक क्रांती कुमार लांका आणि सागरी सीमा मंचचे कोकण क्षेत्र समन्वयक संतोष पावरी, मिरकरवाड्यातील विविध स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी व मच्छीमार सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या सहायक समादेशक फेरा टीपी यांनी केले.

मोहिमेदरम्यान, किल्ले गावातील भगवती बंदराजवळील जेट्टी परिसरात कचरा गाेळा करण्यात आला. हा कचरा पिशव्यांमध्ये स्वतंत्रपणे उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे वैद्यकीय अधिकारी सर्जन लेफ्टनंट गोपन जीजे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमोपचार पथक उपस्थित होते.

रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक वायु अवस्थान यांनीही नवनिर्माण स्कूल, सर्वंकष स्कूल, पोदार स्कूल, गद्रे मत्स्य व्यवसाय समूह यांच्या सहकार्याने समादेशक विकास त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता माेहीम राबवली. या माेहिमेत सुमारे २५० स्वयंसेवक सहभागी झाले हाेते. या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जन काळात मांडवी परिसरात १५० किलो कचरा गोळा केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी