शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

श्रमसाफल्य योजनेतील २४ फ्लॅट लालफितीत

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

कार्यवाहीची मागणी : शासनाकडून ८० लाखांचा निधी जमा

रत्नागिरी : स्वच्छता विभागात काम करणाऱ्या मेहतर समाजातील कर्मचाऱ्यांना शासनाच्या श्रमसाफल्य योजनेतून शहरातील गवळीवाडा येथे २४ फ्लॅट बांधून दिले जाणार आहेत. १ कोटी ३१ लाखांचा हा प्रकल्प असून, त्यातील शासनाचा ८० लाख निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. मात्र, या प्रकल्पाची कागदपत्र जिल्हा प्रशासनाच्या लाल फीतीत अडकली असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी या कामगारांकडून होत आहे.रत्नागिरी पालिकेच्या सफाई विभागात मेहतर समाजातील ज्या कामगारांची २५ वर्षे सेवा झाली आहे, त्यांना हे वन बीएचके फ्लॅट दिले जाणार आहेत. शासनाच्या श्रमसाफल्य योजनेतून या कामगारांना घरे मिळावीत म्हणून नगरसेविका प्रीती सुर्वे गेल्या वर्षभरापासून या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत आहेत. गवळीवाडा येथील पालिकेच्या जागेत या कामगारांसाठी अपार्टमेंट उभारली जाणार आहे. सध्या याच जागेत चाळपध्दतीच्या जुन्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून हे कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह राहात आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून या कामगारांची चांगल्या घरांची मागणी होती. पालिकेने त्यासाठी शासनाच्या श्रमसाफल्य योजनेतून या कामगारांना पक्की घरे देण्याचा प्रस्ताव शासनाला दिला. त्याला मंजुरीही मिळाली. त्यानुसार राज्य शासनाकडून या घरांसाठी ८० लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. याबाबतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही त्रुटींची पुर्तता करण्यास पालिकेला सांगण्यात आले होेते. त्यानुसार ३ जुलै २०१४ रोजी पालिकेकडून त्रुटींची पुर्तता करून पत्र देण्यात आले आहे. मात्र, त्याला आता महिना होत आला तरी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे श्रमसाफल्य योजनेचा हा प्रस्ताव अद्याप लाल फीतीत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)