शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

रत्नागिरी बाजार समितीसाठी २३ टक्के मतदान

By admin | Updated: April 17, 2016 23:55 IST

मतदारांचा निरुत्साह : आज मतमोजणी; अकरा जागांचा फैसला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत रविवारी केवळ २३.२२ टक्केमतदान झाले. मतदारांनी दाखविलेल्या निरुत्साहामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज, सोमवारी या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ९ वाजता साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात होणार आहे. सकाळपासूनच जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांत शांततेत मतदानास सुरुवात झाली. १८ पैकी ११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत १२ हजार ७३२ मतदारांपैकी केवळ ३ हजार १५७ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला, तर १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांनी सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे उमेदवारही जाहीर केले होते. मात्र, कॉँग्रेसमधील गटबाजीमुळे तीन उमेदवारांनी बंडखोरी केली. त्यामुळेच ही निवडणूक लादली गेल्याचे सहकार क्षेत्रातही बोलले जात आहे. १८ जागांपैकी ७ जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. आता आज सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत रिंगणातील १६ जणांचे भवितव्य निश्चित होणार आहे. सोसायटी मतदारसंघात १७२३, व्यापारी अडत मतदारसंघात ३६१, ग्रामपंचायत मतदारसंघात ८८६, तर कृषी प्रक्रिया मतदारसंघात १८७ मतदान झाले. मतदानाची ही आकडेवारी खूपच कमी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी निरुत्साह दाखविल्याने कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. आर. धुळप हे काम पाहत आहेत. या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांमध्ये गजानन पाटील, सुरेश कांबळे, विठाबाई कदम, आशालता सावंतदेसाई, प्रकाश जाधव, संजय नवाथे व मेघा कदम यांचा समावेश आहे. तर निवडणूक रिंगणात असलेले व सोमवारी मतमोजणीनंतर भवितव्य निश्चित होणाऱ्या उमेदवारांमध्ये संजय आंब्रे, अरविंद आंब्रे, राजेश गुरव, अनिल जोशी, दत्तात्रय ढवळे, मधुकर दळवी, शौकत माखजनकर, माधव सप्रे, महेंद्र कदम, निकिता पवार व हेमचंद्र माने यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)