शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

१७ दिवस, तब्बल ६,२१२ किलोमीटर प्रवास; रत्नागिरीतील हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा

By शोभना कांबळे | Updated: June 24, 2023 13:43 IST

प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते

रत्नागिरी : हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा  दुचाकीवरून पूर्ण केली. १७ दिवसांत त्यांनी दोन दुचाकीवरून तब्बल ६,२१२ किलोमीटरचा टप्पा पार केला. यात लांजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सेवक आझाद विचारे यांच्यासोबत प्रतीक विचारे, अमर विचारे आणि विनायक विचारे यांचा सहभाग होता.   १ जून रोजी सकाळी या चाैघांचा प्रवास हातखंबा येथून दोन दुचाकीवरून सुरू झाला. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्याेतिर्लिंगाचे दर्शन घेत ते मध्यप्रदेशात पोहोचले. तेथे त्यांनी ओंकारेश्वर व उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. आग्रा येथील ताजमहाल पाहून ते हरिद्वारला गेले. तिथे सोमप्रयाग, गाैरीकुंड तिथून केदारनाथपर्यंतचे २२ किलोमीटरचे अंतर पायी पाच तासात पार केले. तिथे गर्दी असल्याने सकाळी नऊ वाजता रांगेत उभे राहिल्यानंतर तब्बल दहा तासानंतर सायंकाळी सात वाजता त्यांना केदारनाथ दर्शन झाले.तिथून पुन्हा सोमप्रयाग येथे येऊन त्यांनी पुढील धाम बद्रीनाथचा प्रवास सुरू केला. वाटेत आशिया खंडातील सर्वात उंचावर असलेल्या शिवलिंग तुंगनाथचे तीन किलोमीटर पायी ट्रेक करत त्यांनी दर्शन घेतले. बनियाकुंडे येथे त्यांनी दाेन अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानात वास्तव्य केले. तिथून बद्रीनाथ आणि गंगोत्री या पुढील धामांकडे प्रवास करताना पायी ट्रेक करत अनेक स्थळांचे दर्शन घेतले.या प्रवासादरम्यान बिपरजाॅय चक्रीवादळ अरबी समुद्रातून पुढे सरकत असल्याचे त्यांना बातम्यांमधून कळत होते. आझाद विचारे यांनी या वादळाचे लोकेशन आणि त्याचा मार्ग मोबाइलवर शोधून दिल्ली- गुजरात- मुंबई हा परतीचा मार्ग स्वीकारल्यास वादळ भेटणार, हे गृहीत धरून मार्गच बदलला आणि वाराणसीमार्गे पुन्हा प्रवास सुरू झाला. तिथून नागपूर- नांदेड- लातूर- सोलापूरमार्गे १७ जून रोजी ते हातखंबा येथे पोहोचले.या दुचाकीवरून होणाऱ्या प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र, त्यांनी ते आव्हान झेलत ही ६,२१२ किलोमीटरची यात्रा दुचाकीवरून यशस्वी केली.  यापूर्वीही आझाद विचारे यांनी लेह- लडाख, कन्याकुमारी, गुजरात आदी ठिकाणी बाइक ट्रीप केली आहे. भविष्यात गुजरातमधील गिरनार, सोमनाथ आणि ओडिसामधील जगन्नाथ पुरीपर्यंत बाइक ट्रीप करण्याचा त्यांचा मानस आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी