शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

१७ दिवस, तब्बल ६,२१२ किलोमीटर प्रवास; रत्नागिरीतील हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा

By शोभना कांबळे | Updated: June 24, 2023 13:43 IST

प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते

रत्नागिरी : हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा  दुचाकीवरून पूर्ण केली. १७ दिवसांत त्यांनी दोन दुचाकीवरून तब्बल ६,२१२ किलोमीटरचा टप्पा पार केला. यात लांजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सेवक आझाद विचारे यांच्यासोबत प्रतीक विचारे, अमर विचारे आणि विनायक विचारे यांचा सहभाग होता.   १ जून रोजी सकाळी या चाैघांचा प्रवास हातखंबा येथून दोन दुचाकीवरून सुरू झाला. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्याेतिर्लिंगाचे दर्शन घेत ते मध्यप्रदेशात पोहोचले. तेथे त्यांनी ओंकारेश्वर व उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. आग्रा येथील ताजमहाल पाहून ते हरिद्वारला गेले. तिथे सोमप्रयाग, गाैरीकुंड तिथून केदारनाथपर्यंतचे २२ किलोमीटरचे अंतर पायी पाच तासात पार केले. तिथे गर्दी असल्याने सकाळी नऊ वाजता रांगेत उभे राहिल्यानंतर तब्बल दहा तासानंतर सायंकाळी सात वाजता त्यांना केदारनाथ दर्शन झाले.तिथून पुन्हा सोमप्रयाग येथे येऊन त्यांनी पुढील धाम बद्रीनाथचा प्रवास सुरू केला. वाटेत आशिया खंडातील सर्वात उंचावर असलेल्या शिवलिंग तुंगनाथचे तीन किलोमीटर पायी ट्रेक करत त्यांनी दर्शन घेतले. बनियाकुंडे येथे त्यांनी दाेन अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानात वास्तव्य केले. तिथून बद्रीनाथ आणि गंगोत्री या पुढील धामांकडे प्रवास करताना पायी ट्रेक करत अनेक स्थळांचे दर्शन घेतले.या प्रवासादरम्यान बिपरजाॅय चक्रीवादळ अरबी समुद्रातून पुढे सरकत असल्याचे त्यांना बातम्यांमधून कळत होते. आझाद विचारे यांनी या वादळाचे लोकेशन आणि त्याचा मार्ग मोबाइलवर शोधून दिल्ली- गुजरात- मुंबई हा परतीचा मार्ग स्वीकारल्यास वादळ भेटणार, हे गृहीत धरून मार्गच बदलला आणि वाराणसीमार्गे पुन्हा प्रवास सुरू झाला. तिथून नागपूर- नांदेड- लातूर- सोलापूरमार्गे १७ जून रोजी ते हातखंबा येथे पोहोचले.या दुचाकीवरून होणाऱ्या प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र, त्यांनी ते आव्हान झेलत ही ६,२१२ किलोमीटरची यात्रा दुचाकीवरून यशस्वी केली.  यापूर्वीही आझाद विचारे यांनी लेह- लडाख, कन्याकुमारी, गुजरात आदी ठिकाणी बाइक ट्रीप केली आहे. भविष्यात गुजरातमधील गिरनार, सोमनाथ आणि ओडिसामधील जगन्नाथ पुरीपर्यंत बाइक ट्रीप करण्याचा त्यांचा मानस आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी