शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

गणेशोत्सवासाठी आजपासून कोकणात येणार १५८५ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात दीड लाख गणेशमूर्तींची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात दीड लाख गणेशमूर्तींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येते. नोकरी-व्यवसायासाठी परजिल्ह्यात स्थायिक असलेले मुंबईकर गावी येत असल्याने कोकणात १५८५ जादा गाड्या येणार आहेत. दि. ५ सप्टेंबरपासून कोकणात जादा गाड्यातून मुंबईकरांचे आगमन होणार आहे.

दरवर्षी कोकणात जादा गाड्या मुंबई व उपनगरातून सोडण्यात येतात. गतवर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन झाले असताना अनेक मुंबईकर गावी आले होते. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील अवघ्या २९५ जादा गाड्या आल्या होत्या. कोरोनामुळे आलेल्या गाड्या थेट कोरोना चाचणी केंद्रावर नेण्यात येत होत्या. चाचणी केल्यानंतर मुंबईकरांना विलगीकरण केंद्रावर ठेवण्यात आले होते. विलगीकरण सक्तीचे असल्याने गतवर्षी मुंबईकरांचा फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. मात्र, यावर्षी शासकीय निर्बंध शिथिल करण्यात आल्याने गाड्यांची संख्या वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात २५४, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५७, रत्नागिरी जिल्ह्यात ११७४ जादा गाड्या येणार आहेत. सर्वाधिक जादा गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात असून, चिपळूण व गुहागर तालुक्यात येणार आहेत. दि. ५ ते १० सप्टेंबरपर्यंत गाड्या कोकणात येणार आहेत. मंडणगड तालुक्यात ५४, दापोली ११७, खेड ११४, चिपळूण २६३, गुहागर २६८, देवरूख ८७, रत्नागिरी १४३, लांजा ७३, राजापूर तालुक्यात ५५ जादा गाड्या येणार आहेत. परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून (दि. १४) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ऑनलाइन आरक्षण उपलब्ध करण्यात आले.

--------------------

गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येणार असल्याने रत्नागिरी विभागातर्फे दुरुस्तीपथके, गस्तीपथके, क्रेनची उपलब्धता केली जाणार आहे. कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा व हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्ती पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्ती पथके उपलब्ध केली जाणार आहेत. शिवाय चिपळूण येथे क्रेन ठेवण्यात येणार आहे. अद्यावत ब्रेक व्हॅन विभागात तीन असून, महामार्गावर तैनात ठेवली जाणार आहेत. पैकी भरणानाका, चिपळूण, हातखंबा तिठा येथे ब्रेक डाऊन व्हॅन उपलब्ध असणार आहेत, तर संगमेश्वर आगारात दुरुस्तीपथक उपलब्ध केले जाणार आहे. जिल्ह्यात दि. ५ सप्टेंबरपासून दि. ९ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ————————-

गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. रविवारी सात गाड्या येणार आहेत. दि. ८ रोजी ३०६, तर दि. ९ रोजी सर्वाधिक १०७३ गाड्या येणार आहेत. मंडणगड ते राजापूर आगारात जादा गाड्या दाखल होणार असून, प्रत्येक आगाराला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी