शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महावितरणचे १५ कोटी थकीत

By admin | Updated: June 30, 2016 23:11 IST

कोकण परिमंडल : महावितरणच्या १ लाख १२ हजार ग्राहकांचा समावेश

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलातील १ लाख १२ हजार ५११ ग्राहकांकडे १५ कोटी ५० लाख ३८ हजारांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजार रुपयांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांची थकबाकी आहे.वर्षानुवर्षे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या कोकण परिमंडलातील २८ हजार ५५३ ग्राहकांकडे ९ कोटी ६ लाखांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने पावले उचलली आहेत. कायमस्वरूपी बंद तरीही घरातील अन्य सदस्यांच्या नावे मीटर घेण्यात आलेल्या ग्राहकांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.कोकण परिमंडलातील ८४ हजार ७० घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ८४ लाख ७४ हजार, वाणिज्यिक १२ हजार ७३० ग्राहकांकडे २ कोटी ९५ लाख ८३ हजार, औद्योगिक २ हजार १२७ ग्राहकांकडे १ कोटी ४९ लाख १४ हजार, कृषिपंपाच्या ९ हजार १०४ ग्राहकांकडे ६८ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाधारक १४८७ ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख ४१ हजार, १६०० पथदिव्यांची २ कोटी १३ लाख ३० हजार आणि अन्य १३९३ ग्राहकांकडे २६ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागातील १६ हजार ८५६ ग्राहकांकडे २ कोटी १५ लाख ७२ हजार, खेड विभागातील १८ हजार २१० ग्राहकांकडे २ कोटी ६३ लाख २२ हजार, रत्नागिरी विभागातील ३० हजार २६२ ग्राहकांकडे ३ कोटी ४३ लाख १३ हजारांची थकबाकी असून, जिल्हाभरातील एकूण ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागातील २५ हजार २५३ ग्राहकांकडे ३ कोटी ७७ लाख ५० हजार, कणकवली विभागातील २१ हजार ९३० ग्राहकांकडे ३ कोटी ५० लाख ८१ हजारांची थकबाकी असून, एकूण ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३१ हजारांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)वसुलीची कार्यवाही : घरगुती वीज ग्राहकांची संख्या अधिकमहावितरण कंपनीने थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले आहे. वसुलीसाठी पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे. थकबाकीची रक्कम भरून होणारी कारवाई टाळावी. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे.- कांचन आजनाळकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.