शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१४,७४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By admin | Updated: February 11, 2016 23:46 IST

आम आदमी : महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा पाचव्या क्रमांकावर

शोभना कांबळे -- रत्नागिरी --आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील १४,७४२ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. अवघ्या चार महिन्यात एवढ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे.ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा, या हेतूने शासनाने कर्त्या व्यक्तिला विम्याचे संरक्षण देण्यासाठी ‘आम आदमी विमा योजना’ २ आॅक्टोबर २००७ पासून अस्तित्त्वात आणली आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला ही योजना लागू करता येते. साधारणत: २०१३ सालापासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्याचे अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रुपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रुपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रुपये अर्थसहाय शासनाकडून करण्यात येते.तसेच अशा लाभार्थीच्या ९ ते १२वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही ३०० रुपये इतकी शैक्षणिक मदतीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी १ लाख ६३ हजार २०० हतकी असून १,२१,४९३ इतकी पुरूषांची, तर ४७,७०७ इतकी महिलांची संख्या आहे. आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचे अर्जही आॅनलाईन भरण्यात आले होते. त्यामुळे अनेक समस्यांना शाळांना सामोरे जावे लागले होते. तरीही यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४,७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही शिष्यवृत्ती जमा झाली आहे. या योजनेचा लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.अवघ्या चार महिन्यात मिळाला लाभकर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास शासनाकडून मिळतो आम आदमी विमा योजनेचा लाभ.२ आॅक्टोबर २००७पासून योजना अंमलात.भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला योजना लागू करता येते.यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४ हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा.