शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

१४,७४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By admin | Updated: February 11, 2016 23:46 IST

आम आदमी : महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा पाचव्या क्रमांकावर

शोभना कांबळे -- रत्नागिरी --आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील १४,७४२ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. अवघ्या चार महिन्यात एवढ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे.ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा, या हेतूने शासनाने कर्त्या व्यक्तिला विम्याचे संरक्षण देण्यासाठी ‘आम आदमी विमा योजना’ २ आॅक्टोबर २००७ पासून अस्तित्त्वात आणली आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला ही योजना लागू करता येते. साधारणत: २०१३ सालापासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्याचे अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रुपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रुपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रुपये अर्थसहाय शासनाकडून करण्यात येते.तसेच अशा लाभार्थीच्या ९ ते १२वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही ३०० रुपये इतकी शैक्षणिक मदतीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी १ लाख ६३ हजार २०० हतकी असून १,२१,४९३ इतकी पुरूषांची, तर ४७,७०७ इतकी महिलांची संख्या आहे. आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचे अर्जही आॅनलाईन भरण्यात आले होते. त्यामुळे अनेक समस्यांना शाळांना सामोरे जावे लागले होते. तरीही यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४,७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही शिष्यवृत्ती जमा झाली आहे. या योजनेचा लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.अवघ्या चार महिन्यात मिळाला लाभकर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास शासनाकडून मिळतो आम आदमी विमा योजनेचा लाभ.२ आॅक्टोबर २००७पासून योजना अंमलात.भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला योजना लागू करता येते.यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४ हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा.