शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

१२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन येत्या सोमवारपासून रत्नागिरीत

By मेहरून नाकाडे | Updated: February 3, 2024 18:49 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे १२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवार दि. ५ ते बुधवार ...

रत्नागिरी : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे १२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवार दि. ५ ते बुधवार दि. ७ फेब्रुवारी या कालावधीत स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनासाठी महाराष्ट्रातून सात ते आठ हजार वारकरी रत्नागिरीत येणार आहेत.संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. माजी संमेलनाध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज ठाकूर बुवा (दैठणकर) यांच्याकडून संमेलन अध्यक्षपदाची सूत्रे ह.भ.प.माधवमहाराज शिवणीकर (भक्त पुंडलीक फड प्रमुख) स्विकारणार आहेत. यानंतर महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे श्री विठ्ठल पुरस्काराचे वितरण आयोजित केले आहे. वारकरी संप्रदायाचे फडकरी बांधवांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश पास मंजूर केल्याबद्दल पाच किलो चांदीची श्री विठ्ठलाची मूर्ती देवून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरून संप्रदायासाठी योगदानाबद्दल संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख श्रीमंत सरदार उर्जितसिंह राजे शितोळे (अंकलीकर) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.  पंढरपूर येथील फडकरी दिंडीकरी संघटनेचे सचिव ह.भ.प मनोहरमहाराज आैटी यांना वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवन गाैरव पुरस्कार देवून गाैरविण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ पाईक म्हणून वै.ह.भ.भ.प भानुदास महाराज ढवळीकर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार ह.भ.प देविदास महाराज ढवळीकर स्विकारणार आहेत.दुपारी १ वाजता दिंडी, सायंकाळी ४ वाजता जगद् गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प बापूसाहेब महाराज देहूरकर यांचे किर्तन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता महिला भजनी मंडळातर्फे सामूदायिक हरिपाठ होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी