शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जिल्ह्यात २४ तासांत ११५ नवे रुग्ण; २९ जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७५ हजार ८६२ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी ७२ हजार ३६९ जण बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे तर आतापर्यंत २३४२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. सध्या ११५५ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी-जास्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात ११५ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६८ तर २३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अँटिजन चाचणीत १६०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४७ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

२४ तासांत २ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याआधीच्या २७ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यामुळे एकूण २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद एकाच दिवशी करण्यात आली आहे. बरे झालेल्या ५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.४१ टक्के इतकी आहे तर मृत्यूची टक्केवारी ३ टक्के इतकी झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ५० व त्यावरील जास्त वयोगटांतील मृत्यू झालेल्या १९६६ रुग्णांचा समावेश असून ८२५ सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालय तसेच केअर सेंटरमध्ये एकूण १०७४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी लक्षणे असलेले रुग्ण २६५ असून लक्षणे नसलेल्यांची संख्या ८०९ इतकी आहे. होम आयसोलेशनमध्ये ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.