शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

खारलॅण्डच्या पाण्यामुळे ११५ माड पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील बंधाऱ्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे भरतीचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील बंधाऱ्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे भरतीचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर खारलॅण्ड विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. गुरुवारी सकाळी अधिकाऱ्यांनी माजी सरपंच निखिल बोरकर यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचयादी घातली. यामध्ये ११५ पेक्षा अधिक माडाची झाडे तसेच केळी आणि आंबा कलमांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यावेळी बंधाऱ्यावरील उघडण्यात आलेली मोरी तत्काळ बंद करण्यात येईल, असे सांगितले.

तालुक्यातील वरवडे येथील खारलॅण्ड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला. अर्धवट अवस्थेतील कामामुळे भरतीचे पाणी थेट रहिवासी भागात शिरले. मंगळवारी पहाटे भरतीचे पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांच्या वैयक्तिक मालमत्तेचे यामुळे नुकसान झाले. यामध्ये संतोष सत्यवान पाटील यांचे ३० माड, शंकर बोरकर यांचे २५, महानंदा बोरकर यांचे ४० माड, संदीप बोरकर यांचे २० माड आणि मयूर राणे यांची केळीची झाडे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले. रहिवासी भागात पाणी भरल्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने संबंधित ठेकेदार आणि खारलॅण्ड विभागाने तातडीने हे काम हाती न घेतल्यास प्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा येथील माजी सरपंच निखिल बोरकर यांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर खारलॅण्डच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. बंधाऱ्याची मोरी तत्काळ बंद करण्यात येईल, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.