शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द, शुल्क मिळण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४१५ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द झाली असली तरी परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवीन शैक्षणिक सत्र जूनमध्ये सुरू झाले तरी कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये नववी, दहावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षा असल्याने जेमतेम दीड ते दोन महिने वर्ग सुरू होते. त्यातच विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र, सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य शासनानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातून नियमित २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ४१५ रुपये शुल्क प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेण्यात आले होते. ८८ लाख ७१ हजार ८७० रुपये बोर्डाकडे जमा करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द होऊनही परीक्षा शुल्क परत देण्याबाबत शासनाने अद्याप काहीच घोषित केलेले नाही. परीक्षा शुल्काची रक्कम परत मिळणे अपेक्षित असून, नवीन शासन निर्णयाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोर्डाकडून लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.

जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी ऑनलाइन अध्यापनच सुरू होते. कोरोनामुळे नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मात्र, जेमतेम दीड ते दोन महिनेच शाळा होत्या. परीक्षा रद्द केल्याने शासनाने परीक्षा शुल्क परत करणे गरजेचे आहे.

-तनुश्री गुरव, विद्यार्थिनी

शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, अद्याप गुणांकन किंवा अकरावी प्रवेशाबाबत काहीच जाहीर केलेले नाही. परीक्षा नाही, त्यामुळे शुल्क तरी परत देणार की नाही, याबाबत तरी लवकर निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे.

-सायली आंबेकर, विद्यार्थिनी

सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क परत करणे आवश्यक आहे. याबाबत योग्य व रास्त निर्णय अपेक्षित आहे. प्रवेश परीक्षेचा तिढाही सोडवावा.

-शुभंकर देसाई, विद्यार्थी

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा शुल्क परत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणांकन किंवा अकरावी परीक्षेसाठी सीईटी परीक्षेबाबतही अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी