शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

दहावीची परीक्षा रद्द, शुल्क मिळण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४१५ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द झाली असली तरी परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवीन शैक्षणिक सत्र जूनमध्ये सुरू झाले तरी कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये नववी, दहावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षा असल्याने जेमतेम दीड ते दोन महिने वर्ग सुरू होते. त्यातच विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र, सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य शासनानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातून नियमित २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ४१५ रुपये शुल्क प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेण्यात आले होते. ८८ लाख ७१ हजार ८७० रुपये बोर्डाकडे जमा करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द होऊनही परीक्षा शुल्क परत देण्याबाबत शासनाने अद्याप काहीच घोषित केलेले नाही. परीक्षा शुल्काची रक्कम परत मिळणे अपेक्षित असून, नवीन शासन निर्णयाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोर्डाकडून लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.

जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी ऑनलाइन अध्यापनच सुरू होते. कोरोनामुळे नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मात्र, जेमतेम दीड ते दोन महिनेच शाळा होत्या. परीक्षा रद्द केल्याने शासनाने परीक्षा शुल्क परत करणे गरजेचे आहे.

-तनुश्री गुरव, विद्यार्थिनी

शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, अद्याप गुणांकन किंवा अकरावी प्रवेशाबाबत काहीच जाहीर केलेले नाही. परीक्षा नाही, त्यामुळे शुल्क तरी परत देणार की नाही, याबाबत तरी लवकर निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे.

-सायली आंबेकर, विद्यार्थिनी

सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क परत करणे आवश्यक आहे. याबाबत योग्य व रास्त निर्णय अपेक्षित आहे. प्रवेश परीक्षेचा तिढाही सोडवावा.

-शुभंकर देसाई, विद्यार्थी

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा शुल्क परत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणांकन किंवा अकरावी परीक्षेसाठी सीईटी परीक्षेबाबतही अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी