शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द, शुल्क मिळण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४१५ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द झाली असली तरी परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवीन शैक्षणिक सत्र जूनमध्ये सुरू झाले तरी कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये नववी, दहावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षा असल्याने जेमतेम दीड ते दोन महिने वर्ग सुरू होते. त्यातच विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र, सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य शासनानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातून नियमित २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ४१५ रुपये शुल्क प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेण्यात आले होते. ८८ लाख ७१ हजार ८७० रुपये बोर्डाकडे जमा करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द होऊनही परीक्षा शुल्क परत देण्याबाबत शासनाने अद्याप काहीच घोषित केलेले नाही. परीक्षा शुल्काची रक्कम परत मिळणे अपेक्षित असून, नवीन शासन निर्णयाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोर्डाकडून लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.

जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी ऑनलाइन अध्यापनच सुरू होते. कोरोनामुळे नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मात्र, जेमतेम दीड ते दोन महिनेच शाळा होत्या. परीक्षा रद्द केल्याने शासनाने परीक्षा शुल्क परत करणे गरजेचे आहे.

-तनुश्री गुरव, विद्यार्थिनी

शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, अद्याप गुणांकन किंवा अकरावी प्रवेशाबाबत काहीच जाहीर केलेले नाही. परीक्षा नाही, त्यामुळे शुल्क तरी परत देणार की नाही, याबाबत तरी लवकर निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे.

-सायली आंबेकर, विद्यार्थिनी

सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क परत करणे आवश्यक आहे. याबाबत योग्य व रास्त निर्णय अपेक्षित आहे. प्रवेश परीक्षेचा तिढाही सोडवावा.

-शुभंकर देसाई, विद्यार्थी

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा शुल्क परत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणांकन किंवा अकरावी परीक्षेसाठी सीईटी परीक्षेबाबतही अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी