शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दहावीची परीक्षा रद्द, शुल्क मिळण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४१५ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द झाली असली तरी परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवीन शैक्षणिक सत्र जूनमध्ये सुरू झाले तरी कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये नववी, दहावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षा असल्याने जेमतेम दीड ते दोन महिने वर्ग सुरू होते. त्यातच विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र, सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य शासनानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातून नियमित २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ४१५ रुपये शुल्क प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेण्यात आले होते. ८८ लाख ७१ हजार ८७० रुपये बोर्डाकडे जमा करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द होऊनही परीक्षा शुल्क परत देण्याबाबत शासनाने अद्याप काहीच घोषित केलेले नाही. परीक्षा शुल्काची रक्कम परत मिळणे अपेक्षित असून, नवीन शासन निर्णयाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोर्डाकडून लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.

जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी ऑनलाइन अध्यापनच सुरू होते. कोरोनामुळे नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मात्र, जेमतेम दीड ते दोन महिनेच शाळा होत्या. परीक्षा रद्द केल्याने शासनाने परीक्षा शुल्क परत करणे गरजेचे आहे.

-तनुश्री गुरव, विद्यार्थिनी

शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, अद्याप गुणांकन किंवा अकरावी प्रवेशाबाबत काहीच जाहीर केलेले नाही. परीक्षा नाही, त्यामुळे शुल्क तरी परत देणार की नाही, याबाबत तरी लवकर निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे.

-सायली आंबेकर, विद्यार्थिनी

सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क परत करणे आवश्यक आहे. याबाबत योग्य व रास्त निर्णय अपेक्षित आहे. प्रवेश परीक्षेचा तिढाही सोडवावा.

-शुभंकर देसाई, विद्यार्थी

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा शुल्क परत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणांकन किंवा अकरावी परीक्षेसाठी सीईटी परीक्षेबाबतही अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी