शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
3
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
4
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
5
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
9
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
10
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
11
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
12
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
13
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
14
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
15
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
16
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
17
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
18
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
19
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
20
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

एका दिवसात तब्बल १० बंधारे

By admin | Updated: October 18, 2015 23:59 IST

नायशी ग्रामस्थांचा विक्रम : प्रांताधिकारी यांच्याकडून कौतुकाची थाप

असुर्डे : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी टंचाई भासण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात विजय बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत चिपळूण तालुक्यातील नायशी येथील ग्रामस्थांनी एका दिवसात १० बंधारे बांधून विक्रम केला आहे. त्यांच्या या कामाचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी कौतुक केले आहे.गावचे नूतन सरपंच किशोर घाग यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरच जलशिवार योजना, ग्रामपंचायत स्तरावर मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती तसेच अन्य विकासात्मक कामांना प्रारंभ केला आहे. यावर्षी कमी पडलेला पाऊस व भविष्यात उद्भवणारी पाण्याची समस्या यावर उपाययोजना करावी असे ग्रामपंचायतीने ठरवले होते़ शासनाच्या आवाहनानुसार त्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने १ बंधारा बांधला़ मात्र, ग्रामस्थांचा उत्साह पाहून त्याच दिवशी सर्वानुमते एकाच दिवशी १० विजय बंधारे बांधायचे ठरवण्यात आले व त्याप्रमाणे नियोजनही करण्यात आले. नायशी गावातून जाणाऱ्या नदीवर ३०० ते ४०० मीटर अंतरावर एकाचवेळी दहा बंधारे बांधून चिपळूण तालुक्यात एकाचवेळी १० बंधारे बांधण्याचा विक्रम केला आहे. चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी प्रत्यक्ष वनराई बंधारे पाहण्यासाठी नायशी गावाला भेट दिली. त्याठिकाणी झालेले काम पाहून ते भारावून गेले़ याबद्दल सरपंच किशोर घाग व सदस्य तसेच नायशी ग्रामस्थांंना धन्यवाद दिले़ त्याचप्रमाणे नायशी गावाला विकासात्मक कामांच्या दृष्टीकोनातून सर्व सहकार्य करण्याचे अभिवचनही दिले़ त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, उपगटविकास अधिकारी भोसले, कृषी अधिकारी खरात, चव्हाण, शेंडगे, तलाठी नितीन धुरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. बंधारे बांधकामावेळी दुपारच्या स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते़ यामध्ये प्रांताधिकारी हजारे व गटविकास अधिकारी पाटील व इतर अधिकारी सहभागी झाल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला़ या सर्व बंधाऱ्यांतील पाण्याचे नियोजन व वापर योग्य पध्दतीने केला जाणार आहे़ यामुळे परिसरातील आजूबाजूच्या विहिरींमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होईल़ (प्रतिनिधी)पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम.ग्रामस्थांचा उत्साह पाहून एकाच दिवशी बांधले बंधारे.प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी दिली गावाला भेट़बंधाऱ्यांमुळे विहिरींमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत.स्नेहभोजनाचाही घेतला आस्वाद.