शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

“भाजपवाले घाबरलेत, जनतेला पुन्हा काँग्रेसचेच सरकार हवेय”; अशोक गेहलोत यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 14:04 IST

CM Ashok Gehlot: भाजपकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. म्हणूनच ते असे खोटे आरोप करत आहेत, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली.

CM Ashok Gehlot: राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस सरकार कायम राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तर भाजप काँग्रेसला चितपट करण्यासाठी ताकद पणाला लावताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर टीका केली असून, राजस्थानमधील जनतेला पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार हवे आहे. काँग्रेसचा विजय होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

जयपूर येथे बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, स्थानिक प्रश्न आणि विकासावर निवडणूक लढवत आहोत. भाजप आमच्या धोरणांवर बोलत नाही. ते केवळ खोटे आरोप करत आहेत. मला वाटते की, भाजपवाले घाबरलेत. जनतेला पुन्हा हेच सरकार निवडून द्यायचे आहे. जनता याच सरकारची पुनरावृत्ती करण्याच्या मनस्थितीत आहे. आम्ही हमीभाव, विकास, सुशासन आणि शेतकऱ्यांसाठी केलेले क्रांतिकारी कायदे या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत. मात्र, यावर भाजपकडे उत्तर नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. म्हणूनच ते असे खोटे आरोप करत आहेत, या शब्दांत अशोक गेहलोत यांनी हल्लाबोल केला.

गेल्या ३० वर्षांत गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान झाला नाही 

गेल्या ३० वर्षांत गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान झाला नाही. हे कुटुंब ३० वर्षांपासून कोणत्याही पदाशिवाय आहे, ते फक्त काँग्रेस पक्ष सांभाळत आहेत, असे असताना त्यांच्या पोटात का दुखत आहे? गांधी कुटुंबाला टार्गेट का करता? त्यांनी आम्हाला टार्गेट करावे, आम्ही येथे काम करतो. ते गांधी परिवाला का घाबरतात? याचाच अर्थ असा की, गांधी कुटुंबाची विश्वासार्हता देशात सर्वाधिक आहे, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेस पाचपैकी चार राज्यांत विजयी होण्याची शक्यता आहे, असा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. २०२४ साली लोकसभा निवडणुकांत देशात वारे कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत याचे दर्शन विधानसभा निवडणूक निकालांतून होणार आहे, असेही सचिन पायलट म्हणाले.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोत