शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

अग्निपथ योजनेमुळे युवकांचा स्वप्नभंग; योजनांद्वारे आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 04:14 IST

डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांपेक्षा भाजपने दिलेले वचन वरचढ आहे आणि ते पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी आहे. सत्ताधारी काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करताना मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, काँग्रेसने दिलेले आश्वासन हे गरीब कल्याण, जनकल्याण यासारख्या विषयांपर्यंत मर्यादित राहतात. आम्ही त्यापलीकडे जाऊन विचार करतो. देशात काँग्रेसने आजवर जेवढे काम केले नाही, त्यापेक्षा कित्येक पट अधिक काम आम्ही मागील १० वर्षांमध्ये केले. राजस्थानमध्येही काँग्रेस सरकारने ५ वर्षांमध्ये काहीच केले नाही.

मावजी महाराजांचा आशीर्वाद...मावजी महाराजांचा आशीर्वाद घेत मी एक भविष्यवाणी करू इच्छितो आणि राजस्थानातील लोकांनी ती लिहून घ्यावी की, यावेळीच नव्हे, तर पुढेही राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेवर येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले.

संस्कृतीचा सन्मान हेच ध्येय : शाह 

काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले, तर भाजप मात्र भारतीय संस्कृतीचा सन्मान करत आहे, असे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर प्रहार

जयपूर : अग्निपथ योजनेच्या माध्यमातून युवकांची सैन्यात भरती केली जात आहे. परंतु, या योजनेच्या माध्यमातून लाखो युवकांचे स्वप्नभंग झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. धोलपूरच्या राजाखेडा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, मर्यादित कालावधी झाल्यावर या युवकांनी करायचे काय? त्यांना सैन्यात कायमस्वरूपी घेतले जाणार नसल्याने ही योजना देशातील युवकांचे स्वप्नभंग करणारी आहे, असे राहुल म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ते ओबीसी आहेत. परंतु, जेव्हा आम्ही जातजनगणनेचा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा ते देशात केवळ गरीब ही एकच जात असल्याचे सांगतात. मते मिळविण्यासाठी ओबीसीचा नारा देतात आणि ओबीसींना त्यांच्या हक्काचा वाटा देण्यास नकार देतात.

देशाचा पैसा कुठे चालला? केंद्र सरकार म्हणते आम्ही लोकांसाठी अनेक योजना राबवतो. विविध योजनांच्या माध्यमातून पैसा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. देशातील पैसा कुठे चालला आहे, हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही राहुल यांनी यावेळी केली.

महागाईपासून दिलासा : प्रियंका

देशात महागाई वाढली आहे. परंतु, काँग्रेसच्या कार्यकाळात राजस्थानमध्ये महागाई झळ बसली नाही, असे कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी