शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अग्निपथ योजनेमुळे युवकांचा स्वप्नभंग; योजनांद्वारे आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 04:14 IST

डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांपेक्षा भाजपने दिलेले वचन वरचढ आहे आणि ते पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी आहे. सत्ताधारी काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करताना मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, काँग्रेसने दिलेले आश्वासन हे गरीब कल्याण, जनकल्याण यासारख्या विषयांपर्यंत मर्यादित राहतात. आम्ही त्यापलीकडे जाऊन विचार करतो. देशात काँग्रेसने आजवर जेवढे काम केले नाही, त्यापेक्षा कित्येक पट अधिक काम आम्ही मागील १० वर्षांमध्ये केले. राजस्थानमध्येही काँग्रेस सरकारने ५ वर्षांमध्ये काहीच केले नाही.

मावजी महाराजांचा आशीर्वाद...मावजी महाराजांचा आशीर्वाद घेत मी एक भविष्यवाणी करू इच्छितो आणि राजस्थानातील लोकांनी ती लिहून घ्यावी की, यावेळीच नव्हे, तर पुढेही राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेवर येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले.

संस्कृतीचा सन्मान हेच ध्येय : शाह 

काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले, तर भाजप मात्र भारतीय संस्कृतीचा सन्मान करत आहे, असे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर प्रहार

जयपूर : अग्निपथ योजनेच्या माध्यमातून युवकांची सैन्यात भरती केली जात आहे. परंतु, या योजनेच्या माध्यमातून लाखो युवकांचे स्वप्नभंग झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. धोलपूरच्या राजाखेडा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, मर्यादित कालावधी झाल्यावर या युवकांनी करायचे काय? त्यांना सैन्यात कायमस्वरूपी घेतले जाणार नसल्याने ही योजना देशातील युवकांचे स्वप्नभंग करणारी आहे, असे राहुल म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ते ओबीसी आहेत. परंतु, जेव्हा आम्ही जातजनगणनेचा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा ते देशात केवळ गरीब ही एकच जात असल्याचे सांगतात. मते मिळविण्यासाठी ओबीसीचा नारा देतात आणि ओबीसींना त्यांच्या हक्काचा वाटा देण्यास नकार देतात.

देशाचा पैसा कुठे चालला? केंद्र सरकार म्हणते आम्ही लोकांसाठी अनेक योजना राबवतो. विविध योजनांच्या माध्यमातून पैसा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. देशातील पैसा कुठे चालला आहे, हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही राहुल यांनी यावेळी केली.

महागाईपासून दिलासा : प्रियंका

देशात महागाई वाढली आहे. परंतु, काँग्रेसच्या कार्यकाळात राजस्थानमध्ये महागाई झळ बसली नाही, असे कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी