शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘बिपोरजॉय’चा राजस्थानात कहर, ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 05:56 IST

गुजरात सीमेजवळ नर्मदेचा एक कालवा फुटल्यामुळे अनेक भागांत पाणी शिरले आहे.

जयपूर : चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे राजस्थानमधील तीन जिल्ह्यांमध्ये, विशेषत: जालोर, सिरोही आणि बाडमेरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विविध घटनांमध्ये दोन लहान मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुजरात सीमेजवळ नर्मदेचा एक कालवा फुटल्यामुळे अनेक भागांत पाणी शिरले आहे.

सांचौर शहराला याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. बाडमेर जिल्ह्यात तलावात बुडून दाेन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला, तर राजसमंदजवळ दरड काेसळल्यामुळे तरुण मरण पावला. याच जिल्ह्यात एका महिलेचा घराचे छत काेसळल्यामुळे मृत्यू झाला. बाडमेर, अजमेर, सिराेही, बांसवाडा, उदयपूर, काेटा, जाेधपूर यासह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पिंडवाडा, अबू रोड आणि रेवारमधील अनेक मोठी धरणे पाण्याने भरली आहेत. उत्तर गुजरातमध्ये जोरदार पाऊस ‘बिपोरजॉय’ कमकुवत झाले असले तरी गेल्या २४ तासांत उत्तर गुजरातच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. अधिकाऱ्यांनी बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यांतील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळ