शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

श्रमदानातून तरुणांनी काढला बंधाऱ्यातील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:22 IST

नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.

नेरळ : नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे त्या बंधाºयाने मोकळा श्वास घेतला असून या पावसाळ्यात कोमलवाडीमधील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.नेरळ गावातील मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते आणि तरुण यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील कोमलवाडीमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय करावे अशी माहिती कोमलवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांना विचारून घेतली. स्थानिक कार्यकर्ते सुनील कांबडी यांनी वाडीच्या मागे असलेल्या ओहोळातील बंधारा दगड, माती आणि गाळाने भरला असल्याची माहिती दिली. त्यानुसार मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते असलेले प्रमोद डबरे, विकास कराळे, दिनकर बदे, रोहित गोरे, जगदीश साळुंके, सोनू शेख, कमलेश कराडकर, जयेश कदम,रवींद्र खांबल आणि रवींद्र मिसाळ यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेऊन २५ मे रोजी श्रमदान सुरू केले. प्रमोद डबरे यांनी श्रीफळ वाढवून श्रमदानास सुरुवात केली,त्यावेळी स्थानिक आदिवासी देखील या तरुणांच्या मदतीला आले. दिवसभर श्रमदान करून काढण्यात आलेली माती आणि दगड स्थानिक कार्यकर्ते यांनी तेथे आणून माती आणि दगड डम्परमधून टाकून नेले. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी पावसाळ्यात माती आणि दगडात गाडला गेलेला सिमेंट बंधारा पुन्हा मोकळा झाला. बंधाºयातून किमान २० डम्पर माती बाहेर काढण्यात तरुणांना आणि आदिवासी यांना यश आले.>दरवर्षी भासते पाणीटंचाईमाथेरान डोंगरात २००५ मध्ये भूस्खलन झाले होते. यात मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खाली येऊन अनेक नाले आणि बंधारे मातीने भरून गेले होते.त्यामुळे दरवर्षी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी पाणी वरच्या वर वाहून जाणाºया त्या सिमेंट बंधाºयात यावर्षी पाण्याचा साठा होणार आहे.त्यामुळे त्या सिमेंट बंधाºयाच्या खाली असलेल्या कोमलवाडी ग्रामस्थांच्या विहिरीत पाणीसाठा अधिक प्रमाणात होणार आहे. त्याचवेळी ग्रामस्थांची पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे. त्याबद्दल कोमलवाडी ग्रामस्थ सुनील कांबडी यांनी मानव अधिकार मंडळाचे आभार मानले.