शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

श्रमदानातून तरुणांनी काढला बंधाऱ्यातील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:22 IST

नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.

नेरळ : नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे त्या बंधाºयाने मोकळा श्वास घेतला असून या पावसाळ्यात कोमलवाडीमधील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.नेरळ गावातील मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते आणि तरुण यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील कोमलवाडीमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय करावे अशी माहिती कोमलवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांना विचारून घेतली. स्थानिक कार्यकर्ते सुनील कांबडी यांनी वाडीच्या मागे असलेल्या ओहोळातील बंधारा दगड, माती आणि गाळाने भरला असल्याची माहिती दिली. त्यानुसार मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते असलेले प्रमोद डबरे, विकास कराळे, दिनकर बदे, रोहित गोरे, जगदीश साळुंके, सोनू शेख, कमलेश कराडकर, जयेश कदम,रवींद्र खांबल आणि रवींद्र मिसाळ यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेऊन २५ मे रोजी श्रमदान सुरू केले. प्रमोद डबरे यांनी श्रीफळ वाढवून श्रमदानास सुरुवात केली,त्यावेळी स्थानिक आदिवासी देखील या तरुणांच्या मदतीला आले. दिवसभर श्रमदान करून काढण्यात आलेली माती आणि दगड स्थानिक कार्यकर्ते यांनी तेथे आणून माती आणि दगड डम्परमधून टाकून नेले. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी पावसाळ्यात माती आणि दगडात गाडला गेलेला सिमेंट बंधारा पुन्हा मोकळा झाला. बंधाºयातून किमान २० डम्पर माती बाहेर काढण्यात तरुणांना आणि आदिवासी यांना यश आले.>दरवर्षी भासते पाणीटंचाईमाथेरान डोंगरात २००५ मध्ये भूस्खलन झाले होते. यात मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खाली येऊन अनेक नाले आणि बंधारे मातीने भरून गेले होते.त्यामुळे दरवर्षी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी पाणी वरच्या वर वाहून जाणाºया त्या सिमेंट बंधाºयात यावर्षी पाण्याचा साठा होणार आहे.त्यामुळे त्या सिमेंट बंधाºयाच्या खाली असलेल्या कोमलवाडी ग्रामस्थांच्या विहिरीत पाणीसाठा अधिक प्रमाणात होणार आहे. त्याचवेळी ग्रामस्थांची पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे. त्याबद्दल कोमलवाडी ग्रामस्थ सुनील कांबडी यांनी मानव अधिकार मंडळाचे आभार मानले.