शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अपघात रोखण्यासाठी तरुण सरसावले

By admin | Updated: May 28, 2016 02:35 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते शेलू-वांगणीदरम्यान अनेकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा व धोकादायक गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते शेलू-वांगणीदरम्यान अनेकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा व धोकादायक गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने या गतिरोधकांमुळे दोन महिन्यांत या महामार्गावर अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे यापुढे या रस्त्यावर आपले मित्र, नातेवाईक अथवा कोणत्याही प्रवाशांना अपघात होऊ नये यासाठी नेरळ व परिसरातील तरु णांनी एकत्र येऊन नेरळ ते शेलूदरम्यान स्वखर्चाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढण्याचे काम केल्याने या तरु णांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कर्जत-कल्याण राज्य मार्गाचे चौपदरीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. एमएमआरडीएने या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारले होते, परंतु रस्त्याकडेच्या स्थानिकांनी आपल्या मर्जीने बेकायदा गतिरोधक उभारले आहे. या गतिरोधकांमुळे अनेकांना अपघात होऊन मोठ्या प्रमाणात अनेकांना त्रास सहन करवा लागला आहे. मात्र एमएमआरडीएचे अधिकारी या बेकायदा गतिरोधक टाकणाऱ्यांवर करवाई करीत नाहीत. त्यामुळे असा त्रास पुन्हा कोणालाही होऊ नये म्हणून यावर काय उपाययोजना करता येईल, यासाठी नेरळ येथील तरु ण एकत्र आले व त्यांनी हे अपघात कसे टाळता येथील याच्यावर विचारविनिमय सुरू केला. त्यांनी या मार्गावरील जेवढ्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत व जे अतिधोकादायक आहेत, त्या गतिरोधकांवर स्वखर्चाने पांढरे पट्टे ओढण्याचे काम केले आहे; जेणेकरून या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल. नेरळमधील तरु णांनी केलेले हे काम कौतुकास्पद असून, यामुळे अपघाताचे कमी होईल यात शंकाच नाही. नेरळमधील प्रवीण कोळंबे व त्यांचे सहकारी मित्र रोहित कराळे, हितेश मराठे, निदान कराळे, संकेत कराळे, बंटी कराळे, रोहित कराळे यांनी एकत्र येऊन हे काम केले. कर्जत-कल्याण राज्य मार्गावर अनेक ठिकाणी गरज नसतानाही बेकायदा गतिरोधक उभारले आहेत व त्यावर पांढरे पट्टेही ओढले नसल्याने गतिरोधकांचा अंदाज येत नाही. यामुळे अनेकांना या मार्गावर अपघात झाला आहे. असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही एकत्र येऊन हे गतिरोधक रंगविण्याचे काम केले आहे; जेणेकरून या गतिरोधकांमुळे कोणालाही अपघात होऊ नये, अशी आमची यामागची भावना आहे.- प्रवीण कोळंबे, जागृत तरु ण, नेरळ