शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
3
निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
4
नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
5
'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
6
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
7
'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
8
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?
9
"तोंडावर थुंकला, पोटात लाथा मारल्या, मान धरली अन्..."; अभिनेत्रीला नवऱ्याने केलेली मारहाण
10
उत्तर प्रदेशात 24 तासांत 10 चकमकी; 8 शहरांमध्ये कारवाई, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण...
11
"तू गोरी नाहीयेस, डान्स करू नकोस", अमृता सुभाषला करावा लागला वर्णभेदाचा सामना, म्हणाली- "शाळेतल्या बाईंनी..."
12
“अशी भाषा सहन करणार नाही, राहुल गांधी अन् काँग्रेस भ्याड धमकीला घाबरत नाही”: हर्षवर्धन सपकाळ
13
Mumbai: प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे, मग आपण का जगतोय? अल्पवयीन मुलीची ४५व्या मजल्यावरून उडी
14
परदेशी विद्यार्थी गेले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांचा डोनाल्ड ट्रम्पना इशारा
15
लोकसभेला प्रस्ताव नाकारलेला; कमल हसन राज्यसभेवर जाणार? डीएमकेने एक जागा सोडली
16
Video: दिग्वेश राठीने भरमैदानात केलं असं काही... विराट कोहली, ऋषभ पंत दोघांनाही हसू अनावर
17
केवळ टेकच नाही तर HR प्रोफेशनल्सचीही नोकरी खाऊ लागला AI; IBM नं ८००० कर्मचाऱ्यांना काढलं
18
कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...
19
आता घरबसल्या होईल मालमत्ता नोंदणी! ११७ वर्षांचा जुना कायदा होणार रद्द, काय असणार नवीन नियम?
20
“पाकमध्ये तुम्हाला पाठवायचे की मोदींना, POK घेण्याचे पुढे काय झाले?”: राऊतांचा राणेंना सवाल

अपघात रोखण्यासाठी तरुण सरसावले

By admin | Updated: May 28, 2016 02:35 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते शेलू-वांगणीदरम्यान अनेकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा व धोकादायक गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते शेलू-वांगणीदरम्यान अनेकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा व धोकादायक गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने या गतिरोधकांमुळे दोन महिन्यांत या महामार्गावर अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे यापुढे या रस्त्यावर आपले मित्र, नातेवाईक अथवा कोणत्याही प्रवाशांना अपघात होऊ नये यासाठी नेरळ व परिसरातील तरु णांनी एकत्र येऊन नेरळ ते शेलूदरम्यान स्वखर्चाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढण्याचे काम केल्याने या तरु णांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कर्जत-कल्याण राज्य मार्गाचे चौपदरीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. एमएमआरडीएने या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारले होते, परंतु रस्त्याकडेच्या स्थानिकांनी आपल्या मर्जीने बेकायदा गतिरोधक उभारले आहे. या गतिरोधकांमुळे अनेकांना अपघात होऊन मोठ्या प्रमाणात अनेकांना त्रास सहन करवा लागला आहे. मात्र एमएमआरडीएचे अधिकारी या बेकायदा गतिरोधक टाकणाऱ्यांवर करवाई करीत नाहीत. त्यामुळे असा त्रास पुन्हा कोणालाही होऊ नये म्हणून यावर काय उपाययोजना करता येईल, यासाठी नेरळ येथील तरु ण एकत्र आले व त्यांनी हे अपघात कसे टाळता येथील याच्यावर विचारविनिमय सुरू केला. त्यांनी या मार्गावरील जेवढ्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत व जे अतिधोकादायक आहेत, त्या गतिरोधकांवर स्वखर्चाने पांढरे पट्टे ओढण्याचे काम केले आहे; जेणेकरून या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल. नेरळमधील तरु णांनी केलेले हे काम कौतुकास्पद असून, यामुळे अपघाताचे कमी होईल यात शंकाच नाही. नेरळमधील प्रवीण कोळंबे व त्यांचे सहकारी मित्र रोहित कराळे, हितेश मराठे, निदान कराळे, संकेत कराळे, बंटी कराळे, रोहित कराळे यांनी एकत्र येऊन हे काम केले. कर्जत-कल्याण राज्य मार्गावर अनेक ठिकाणी गरज नसतानाही बेकायदा गतिरोधक उभारले आहेत व त्यावर पांढरे पट्टेही ओढले नसल्याने गतिरोधकांचा अंदाज येत नाही. यामुळे अनेकांना या मार्गावर अपघात झाला आहे. असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही एकत्र येऊन हे गतिरोधक रंगविण्याचे काम केले आहे; जेणेकरून या गतिरोधकांमुळे कोणालाही अपघात होऊ नये, अशी आमची यामागची भावना आहे.- प्रवीण कोळंबे, जागृत तरु ण, नेरळ