शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

By राजेश भोस्तेकर | Updated: September 8, 2023 12:51 IST

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अलिबाग : रायगडात पावसाने ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिना उजाडताच दमदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता दिली आहे. ७ सप्टेंबरपासून पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे. 

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. अती मुसळधार पाऊस दिला असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात चार महिने साडे तीन हजार मिमी पाऊस दरवर्षी पडत असतो. 

चार महिने पावसाचे दमदार आगमन होते. मात्र यंदा जून मधील पंचवीस दिवस वीना पावसाचे गेले. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर पूर्ण जुलै महिना पावसाने जिल्ह्यात ठाण मांडला. जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती, दरड दुर्घटना घडल्या. तर जिल्ह्यातील धरणेही तुडुंब भरली. त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली. आतापर्यंत जिल्ह्यात ९० टक्के पाऊस पडला आहे. 

ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली होती. मात्र सप्टेंबर महिना उजाडल्यानंतर पावसाची चाहूल लागली असल्याने शेतकरी सुखावला आहे. ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पडणार आहे. जिल्ह्याला यलो अलर्ट असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात अनेक भागात पावसाची मोठी सर येत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी ही सुखावला आहे. सतत पाऊस पडत असला तरी नद्या ह्या इशारा पातळी खालून वाहत आहे. त्यामुळे कुठेही पूरस्थिती निर्माण झालेली नाही आहे. मात्र काही सखल भागात पाणी साचले आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस