शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

By राजेश भोस्तेकर | Updated: September 8, 2023 12:51 IST

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अलिबाग : रायगडात पावसाने ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिना उजाडताच दमदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता दिली आहे. ७ सप्टेंबरपासून पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे. 

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. अती मुसळधार पाऊस दिला असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात चार महिने साडे तीन हजार मिमी पाऊस दरवर्षी पडत असतो. 

चार महिने पावसाचे दमदार आगमन होते. मात्र यंदा जून मधील पंचवीस दिवस वीना पावसाचे गेले. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर पूर्ण जुलै महिना पावसाने जिल्ह्यात ठाण मांडला. जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती, दरड दुर्घटना घडल्या. तर जिल्ह्यातील धरणेही तुडुंब भरली. त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली. आतापर्यंत जिल्ह्यात ९० टक्के पाऊस पडला आहे. 

ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली होती. मात्र सप्टेंबर महिना उजाडल्यानंतर पावसाची चाहूल लागली असल्याने शेतकरी सुखावला आहे. ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पडणार आहे. जिल्ह्याला यलो अलर्ट असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात अनेक भागात पावसाची मोठी सर येत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी ही सुखावला आहे. सतत पाऊस पडत असला तरी नद्या ह्या इशारा पातळी खालून वाहत आहे. त्यामुळे कुठेही पूरस्थिती निर्माण झालेली नाही आहे. मात्र काही सखल भागात पाणी साचले आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस