शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

खासगीकरण प्रस्तावाविरोधात कामगारांची जेएनपीटीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:19 IST

आंदोलनाला महाआघाडीचा पाठिंबा; कासव चौकातील सभेत घोषणाबाजी

उरण : पीपीपी धोरणाला विरोध आणि निषेध करण्याची भूमिका मांडतानाच भूमिपुत्रांच्या त्यागावर उभे राहिलेल्या जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण कदापिही होऊन दिले जाणार नाही. कामगारांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा जाहीर करतानाच खासगीकरणाचा प्रस्ताव कामगार, महाआघाडीच्या बळावर हाणून पाडू, असा ठाम निर्धार शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण येथील जाहीर मोर्चातून व्यक्त केला.केंद्र सरकारच्या पीपीपी धोरणांतर्गत जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याविरोधात जेएनपीटीतील विविध कामगार संघटना आणि आजी-माजी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील यांनी बुधवारी (१६) सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर आणि खासदार श्रीरंग बारणे व सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटीवर धडक दिली. आयोजित मोर्चामध्ये बबन पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, कामगार कॉंग्रेसचे नेते महेंद्र घरत, माकपचे मधुसुदन म्हात्रे, ॲड. विजय पाटील, संजय ठाकूर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, मनोज भगत, शेकडो कामगार यामध्ये सहभागी झाले होते.जेएनपीटीच्या कासव चौकात झालेल्या सभेत कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नौकानयन मंत्री मनसुख मांडवीया, जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. यावेळी मोर्चेकरी कामगारांना मार्गदर्शन करताना खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी सरकारच्या कोणत्याही प्रकल्पाचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र सत्तेवर येताच ती बदलली. देशातील अनेक सरकारी मालकीच्या कंपन्या, प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा त्यांनी सपाटाच लावला असल्याची टीका शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. जेएनपीटीची केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाट लागली आहे. त्याचे खापर मात्र कामगारांवर फोडले जात आहे. पीपीपीच्या भूमिकेबाबत जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र भूमिका पटली नसल्याचे स्पष्ट करत निषेध केल्याचेही बारणे यांनी सांगितले. कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात वेळ पडल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल. यासाठी कामगारांनी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहनही बारणे यांनी केले. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेरपुनर्वसनासाठी होत असलेली दिरंगाई आणि सीआरएस फंडाच्या उधळपट्टीबाबतही बारणे यांनी निषेध केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर करतानाच बंदराचे खासगीकरण न करता भूमीपुत्रांना घेऊनच बंदराचे आधुनिकीकरण करून जेएनपीटीने स्वत: बंदर चालविण्याचे आवाहन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले. यावेळी बबन पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, ॲड. विजय पाटील, संजय ठाकूर यांनीही पीपीपी धोरणाला विरोध केला.‘जेएनपीटी अध्यक्षांची भेट घेण्याची गरज नाही’ मंगळवारी नौकानयन मंत्री मनसुख मांडवीया यांच्याशी दूरध्वनीवरून २५ मिनिटांच्या चर्चेत कामगार संघटना, नेते यांच्याशी येत्या काही दिवसात दिल्लीत नव्हे तर जेएनपीटीत येऊन बैठक बोलावण्यात येईल. त्यानंतरच जेएनपीटी टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मंत्री मांडवीया यांनी दिल्याची माहिती खा. श्रीरंग बारणे यांनी दिली. त्यामुळे जेएनपीटी अध्यक्षांची भेट घेण्याची आवश्यकता नसल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.विरोधकांवर खासदारांची टीकाहनुमान कोळीवाडा, नवीन शेवा गावाच्या फेरपुनर्वसनाबाबत जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेचा खा. सुनील तटकरे यांनी खरपूस समाचार घेतला.  राज्यात दोन दिवस अधिवेशन घेतल्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. मात्र दिल्लीतील लोकसभेचे अधिवेशन रद्द केल्याबद्दल विरोधक मूग गिळून गप्प बसले असल्याची टीका केली.

टॅग्स :JNPTजेएनपीटीsunil tatkareसुनील तटकरे