शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

फुटलेल्या बंधा-यांच्या दुरुस्तीचे श्रमदानातून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:24 IST

समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेऊन, हा निर्णय रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणातील उधाणग्रस्त भातशेती समस्येवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहे.

अलिबाग : समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेऊन, हा निर्णय रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणातील उधाणग्रस्त भातशेती समस्येवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी शहापूर-धेरंडच्या शेतकºयांशी केलेल्या सखोल चर्चेअंती या सर्व शेतकºयांना खºया अर्थाने नवा आत्मविश्वास गवसला असल्याचे गुरुवारी शहापूरमधील २००च्या वर स्त्री-पुरुष शेतकºयांनी श्रमदामातून फुटलेल्या संरक्षक बंधाºयांचे दुरुस्तीचे काम सुरू के ले आहे.समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय झाला आहे; परंतु गावांतील सर्व शेतकºयांची जॉब कार्ड तयार होऊन, कामास मंजुरी मिळून प्रत्यक्ष रोजगार हमी योजनेतून कामे सुरू होण्यास किमान १० ते १२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, येत्या १५ फेब्रुवारी रोजी असलेल्या अमावास्येपूर्वी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती (खांडी बुजविणे) केली नाही, तर पुन्हा अमावास्येच्या उधाणाला गावात समुद्राचे पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे.नेमकी नैसर्गिक समस्या व शासकीय तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन, शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गावप्रमुख अमरनाथ भगत, महादेव थळे, रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून ‘आता आपल्याला वाचायचे असेल, तर कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरु ष व महिला यांनी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी) गुरुवारपासून यायचे आहे. त्यांच्या या हाकेला (आवाहनाला) सर्व गावकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन, गावाच्या पूर्वे कडील बाजूस असलेल्या भंगारकोठ्यातील भगदाडे (खांडी) गुरुवारी दिवसभर श्रमदान करून बांधून काढली. शुक्रवारी पुन्हा पश्चिमेकडील बाजूस जाऊन उर्वरित भगदाडे (खांडी) बांधणार असल्याची माहिती अमरनाथ भगत यांनी दिली आहे.>संरक्षक बंधाºयांच्या २५ भगदाडांच्या मोजमापाच्या नोंदीशहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागाकडील संरक्षक बंधारे एकूण २५ ठिकाणी फुटले आहेत. मोठी भगदाडे (खांडी) पडली आहेत.या सर्व २५ भगदाडांची मोजमापे गावातील तरुण शेतकºयांनी मोजून घेऊन त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत.गुरुवारी बांधून काढलेल्या सुमारे १३ ते १४ भगदाडांची (खांडींची) मोजमापेही घेऊन त्यांच्याही रीतसर नोंदी करून ठेवल्या असल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड