शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

महिलांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:24 IST

खालापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लागला आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही या परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

मोहोपाडा : एकीकडे खालापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर होण्याच्या मार्गावर असताना मात्र खालापूर शहरातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे.

खालापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लागला आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही या परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. येथील महिलांना काही अंतर पायपीट करून विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. यावेळी रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. डोक्यावर भरलेल्या पाण्याचे हंडे घेऊन महिलांना रस्ता ओलांडावा लागत आहे. यावेळी रस्ता ओलांडत असताना अपघात होण्याची अधिक शक्यता आहे. काही वर्षापूर्वीच ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. निवडणुकीअगोदर सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने देखील पाण्यात गेल्यासारखी नागरिकांना वाटू लागली आहेत. शहरातील नागरिक आजही या गंभीर समस्येला सामोरे जाताना दिसत आहेत. महिलांना यामध्ये मोठा त्रास सहन करावा लागत असून याकरिता खालापूर नगरपंचायतीने महिलांसमोर असणारी पाण्याची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड