शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 00:09 IST

दोन वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम इंदापूर ते कोकणच्या तळापर्यंत सुरू झाले आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण तेजीत सुरू झाले. महाड, पोलादपूर तालुक्यांतील जवळपास आठ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. मोजणीत चुका झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचा नव्याने सर्व्हे करण्यात आला. यामध्ये जवळपास तीन हजार शेतकºयांचा समावेश आहे. आता मोजणीची कायदेशीर बाब पूर्ण झाली आहे. मात्र, मोबदल्यासाठी वर्षभर महामार्ग बाधित शेतकरी महाड प्रांत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. पुढील काही दिवसांत मोबदला मिळाला नाही तर महामार्गाचे सुरू असलेले काम बंद पाडून रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.दोन वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम इंदापूर ते कोकणच्या तळापर्यंत सुरू झाले आहे. केंद्र सरकारकडून २०२० अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊन महामार्ग सुरू होईल, असा दावा केला जात आहे. चौपदरीकरणामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या जमिनी, बांधकामे बाधित झाली. घाईगडबडीत महामार्गालगत असलेल्या जमिनींचे संपादन करण्यात आले. २०१७ मध्ये जमिनींचे निवाडे करत केंद्र सरकारकडून मोबदल्याची रक्कम येऊन २०१८ मध्ये पैशाचे वाटपही झाले. मात्र हजारो शेतकºयांच्या जमिनी नजरचुकीने राहिल्या. त्या जमिनींचे पुन्हा निवाडे करत सरकारकडून मोबदला देण्याचे निश्चित झाले. मात्र, वर्षभरापासून शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत महाड प्रांत कार्यालयाच्या फेºया मारत आहेत. त्यांना एक रुपयाही मिळलेला नाही. त्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त होत असून, पुढील काही दिवसांत मोबदला न मिळाल्यास महामार्गाचे काम बंद पाडू, तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामामुळे महाड, पोलादपूरमधील आठ हजार शेतकºयांच्या जमिनी बाधित झाल्या. त्यांच्या निवाड्यानुसार ५२५ करोड रुपये सरकारकडून महाड महसूल विभागाच्या खात्यात जमा झाले. २०१८ मध्ये याचे वाटपही पूर्ण झाले.- नजरचुकीने ज्या शेतकºयांना मोबदला मिळू शकला नाही, अशा शेतकºयांची संख्या जवळपास अडीच हजार इतकी आहे.- या शेतकºयांच्या बाधित जमिनींचे पुन्हा सर्वेक्षण करून २०१८ मध्ये महाड महसूल विभागाने सुमारे ८६ कोटी रुपयांच्या मोबदल्याची मागणी वरिष्ठ कार्यालयांकडे केली आहे. मात्र, वर्ष उलटून गेले तरी एक रुपयाही न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून,महामार्गाचे काम बंद करण्याचा पवित्रा घेण्याच्या स्थितीत आहेत.महामार्गाच्या चौपदरीकरणात काही शेतकºयांना मोबदला मिळालेला नाही. त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, निधी मिळण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. हा मोबदला तत्काळ मिळण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहारही सुरू आहे.- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, महाड

टॅग्स :Raigadरायगड