शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भात, नाचणीच्या लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ, खरीप हंगाम तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:02 IST

यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे.

जयंत धुळप अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणाऱ्या भाताची(तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या ८८.३४ टक्के म्हणजे १ लाख ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. द्वितीय क्रमांकाचे महत्त्वाचे पीक असणाºया नागलीची लागवड ५.७० टक्के म्हणजे ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

रायगड जिल्ह्याचे भात हे प्रमुख पीक असून २०१८-१९च्या खरीप हंगामात भाताचे क्षेत्र जिल्ह्यात १ लाख ४ हजार १०० हेक्टर होते, त्यात यंदा ५०० हेक्टरने वाढ होवून ते १ लाख ४ हजार ६०० हेक्टर झाले आहे. २०१८-१९च्या खरीप हंगामात नागलीचे ५ हजार ६३० हेक्टर असणारे लागवड क्षेत्र यंदा १ हजार १२५ हेक्टरने वृद्धिंगत होवून ६ हजार ७५५ हेक्टर झाले आहे.

भाताची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड अलिबाग तालुक्यात १४ हजार ३०० हेक्टरात होणार असून त्या खालोखाल महाड तालुक्यात १३ हजार ३०० हेक्टर तर माणगावमध्ये १२ हजार ५०० हेक्टरात भात लागवड होणार आहे. नागलीची जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार हेक्टर लागवड माणगाव तालुक्यात होणार आहे तर महाडमध्ये १ हजार ५०० तर पोलादपूरमध्ये १ हजार हेक्टरवर नागलीची लागवड होणार आहे. इतर तृणधान्यांची सर्वाधिक लागवड माणगाव तालुक्यात १ हजार २०० हेक्टरवर होणार आहे. उर्वरित पिकांमध्ये १.१४ टक्के क्षेत्रावर म्हणजे १ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर तूर, ३.८८ टक्के क्षेत्रावर म्हणजे ४ हजार ६०० हेक्टरावर इतर तृणधान्ये तर ०.८७ टक्के क्षेत्रावर म्हणजे १ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर इतर कडधान्यांची लागवड होणार आहे.

गत हंगामात भाताच्या उत्पादकतेत ५२ किलो प्रति हेक्टरी वाढ२०१८-१९च्या खरीप हंगामात भाताची सरासरी उत्पादकता २ हजार ७६९ किलो प्रति हेक्टर साध्य झाली होती. त्यापूर्वीच्या सरासरीपेक्षा ही उत्पादकता ५२ किलो प्रति हेक्टरी अधिक प्राप्त झाली आहे.२०१८-१९ मध्ये नागलीची उत्पादकता ९९२ किलो प्रति हेक्टर प्राप्त झाली होती, ती सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत १७५ किलो प्रति हेक्टर अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाली, माणगाव, श्रीवर्धनचा सॅटलाइट सर्व्हे ठरला चुकीचा२०१८च्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरी ३२०१.२ मिमी पाऊस झाला होता, त्या तुलनेत २०१८-१९च्या खरीप हंगामात २ हजार ७९६ मिमी म्हणजे ८७.३४ टक्के पाऊस पडला होता. गत खरीप हंगामात सुधागड तालुक्यात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला होता. सॅटलाइट सर्व्हेच्या आकडेवारीनुसार सुधागड-पाली, माणगाव व श्रीवर्धन या तीन तालुक्यांत पिकाच्या इंडेक्सनुसार दुष्काळसदृश स्थिती दर्शविण्यात आली होती. मात्र पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असल्यामुळे सॅटलाइट इंडेक्स आकडेवारीची प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून पाहणी करून पडताळणी केली असता, या तीन तालुक्यांतील भाताची उत्पादकता सरासरी इतकी प्राप्त झाली असून दुष्काळसदृश स्थिती नसल्याचे निष्पन्न झाले. परिणामी सॅटलाइट सर्व्हे हे प्रसंगी चुकीचे ठरू शकतात हे या निमित्ताने स्पष्ट झाले. 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडalibaugअलिबाग