शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच आगामी निवडणुका लढविणार - तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:41 IST

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत

रेवदंडा : धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी चौल येथे काढले.चौल नाका येथे अलिबाग तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी तटकरे बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असून रोजगार निर्मितीचे भारतीय जनता पक्षाने दिलेले आश्वासन फसवे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.रायगडचे खासदार केंद्रीय मंत्री असून एकही उद्योग या जिल्ह्यात आणला नाही, ही मंत्रिपदाची शोकांतिका आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली असताना सरकार गांभीर्याने दखल घेत नाही असे सांगून गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतीचे, मच्छीमारांचे केलेले नुकसानाबाबत राज्य सरकार काही बोलत नाही. नजीकच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन विजय संपादन करण्याचा सल्ला तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.मेळाव्यात तालुक्यातील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर काही कार्यकर्त्यांना पदावर नियुक्ती करण्याची पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्र माला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, मांडवा ते रेवदंडा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत खरसंबले व आसिफ किरकिरे यांनी केले.