शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

विजेचे १०० कोटी गेले कुठे?; अलिबागकरांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:40 IST

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बिल न भरण्याचा इशारा

अलिबाग : ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सरकारने तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र तरीही तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांपासून होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण असून दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे.सोमवारी शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सेना पदाधिकाºयांनी फैलावर घेतले. पुढील सात दिवसांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांना दिले.महावितरण कंपनीने वेळोवेळी भारनियमन करून दुरुस्तीची कामे केल्याचा दावा केला आहे, मात्र तरीही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. सातत्याने खंडित वीजपुरवठा करणाºया अलिबागच्या महावितरण विभागाला रॉकेलचा पेटता दिवा शिवसेनेने भेट म्हणून देत अनोखे आंदोलन केले.वीज वाहक तारा, गंजलेले खांब, डीपी, सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. असे असताना महावितरणकडून आवश्यक साधनांचा पुरवठा कर्मचाºयांना होत नसल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांनी केला.१०० कोटी रुपयांच्या निधीतून कोणत्या प्रकारची कामे केली जाणार आहेत? कोणत्या विभागामध्ये किती कामे केली जाणार आहेत? कामाचे नियोजन आणि निधीचा होणारा विनियोग यांची सुस्पष्ट माहिती लेखी स्वरूपात द्यावी तसेत ढासळलेल्या वीजपुरवठ्याबाबत सुधारणा झाली नाही तर विजेचे बिल भरणार नाही असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते विजय कवळे, कामगार नेते दीपक रानवडे, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना विशेषत: महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये लवकरच सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी केली.महावितरणच्या अखत्यारीत असणाºया सब स्टेशनमध्ये सहायक अभियंता, वायरमन, लाइनमन यांची पदे रिक्त आहेत. ती तातडीने भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली.पावसाळ््यापूर्वीची तयारी म्हणून महावितरणने दुरुस्तीच्या नावावर सहा-सहा तासांचे भारनियमन केले होते. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने महावितरणचा कारभार उघडकीस आला. दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरूच आहे. दुरुस्तीची कामे करूनही आठ-आठ तास वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुरुस्तीची कामे पूर्ण करूनही तारा तुटणे, खांब कोसळणे, कंडक्टर तुटणे, डीपीमध्ये बिघाड होणे हे चक्र सातत्याने सुरूच असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीजalibaugअलिबाग