शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

ग्रामसेवकांवर कारवाई कधी

By admin | Updated: October 14, 2015 02:53 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.

आविष्कार देसाई ,  अलिबागस्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याला न जुमानणाऱ्या सुमारे ११७ ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा जिल्हा परिषद प्रशासन कधी उगारणार, असा प्रश्न आहे.येत्या पाच महिन्यांत २९८ ग्रामपंचायतींमध्ये १७ हजार १८२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून ८२४ ग्रामपंचायती आहेत. २०१५-१६च्या कृती आराखड्यानुसार २९८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. २९८ ग्रामपंचायतींपैकी ११७ ग्रामपंचायतींच्या एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ अखेर स्वच्छ भारत मिशनमध्ये ग्रामसेवकांनी न केलेल्या कामाचे मूल्यमापन आॅनलाइन दिसत आहे. ही आकडेवारी ७ आॅक्टोबर २०१५ पर्यंतची आहे. ग्रामसेवकांसाठी सातत्याने कार्यशाळा, आढावा सभा आणि विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्यांच्याकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.२९८ ग्रामपंचायतींमध्ये २०१५-१६ या कालावधीत १९ हजार ५८२ वैयक्तिक शौचालयाच्या उद्दिष्टापैकी दोन हजार ४०० शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या पाच महिन्यांत १७ हजार १८२ शौचालये बांधून पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे यासाठी लोकसहभागाबरोबरच ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.ग्रामसेवकांबरोबरच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सभापती, सदस्य यांचाही सहभाग गरजेचा राहणार आहे.