शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

ग्रामसेवकांवर कारवाई कधी

By admin | Updated: October 14, 2015 02:53 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.

आविष्कार देसाई ,  अलिबागस्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याला न जुमानणाऱ्या सुमारे ११७ ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा जिल्हा परिषद प्रशासन कधी उगारणार, असा प्रश्न आहे.येत्या पाच महिन्यांत २९८ ग्रामपंचायतींमध्ये १७ हजार १८२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून ८२४ ग्रामपंचायती आहेत. २०१५-१६च्या कृती आराखड्यानुसार २९८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. २९८ ग्रामपंचायतींपैकी ११७ ग्रामपंचायतींच्या एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ अखेर स्वच्छ भारत मिशनमध्ये ग्रामसेवकांनी न केलेल्या कामाचे मूल्यमापन आॅनलाइन दिसत आहे. ही आकडेवारी ७ आॅक्टोबर २०१५ पर्यंतची आहे. ग्रामसेवकांसाठी सातत्याने कार्यशाळा, आढावा सभा आणि विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्यांच्याकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.२९८ ग्रामपंचायतींमध्ये २०१५-१६ या कालावधीत १९ हजार ५८२ वैयक्तिक शौचालयाच्या उद्दिष्टापैकी दोन हजार ४०० शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या पाच महिन्यांत १७ हजार १८२ शौचालये बांधून पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे यासाठी लोकसहभागाबरोबरच ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.ग्रामसेवकांबरोबरच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सभापती, सदस्य यांचाही सहभाग गरजेचा राहणार आहे.