शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

‘जंजिरा’चे दरवाजे कधी उघडणार? पर्यटक प्रतीक्षेत! मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 10:56 IST

पावसाचे प्रमाण कमी, वातावरणही चांगलं तरीही किल्ला बंदच

लोकमत न्यूज नेटवर्क, आगरदांडा: मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून वातावरणही चांगलं आहे. मात्र, जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंदी कायम आहे. यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरून पर्यटकांची ने -आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागांतून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करीत असतात. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधून  प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळतो. जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो आणि व्यावसायकांची आर्थिक परिस्थिती भक्कम होते. मात्र, पर्यटक येत नसल्याने येथील रोजगार बुडाला आहे, अशी अनेकांनी सांगितले.

मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार

येत्या ३० ऑगस्ट रोजी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडले जातील. परंतु ते साफ-सफाई करिता संपूर्ण किल्ला पंधरा दिवस तरी जातात. तोपर्यंत मेरीटाइम बोर्डचाही पत्रव्यवहार होईल. साधारण जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत वातावरण पाहून खुला केला जाईल.- बजरंग येलीकर, अधिकारी पुरातत्त्व विभाग

टॅग्स :FortगडRaigadरायगड