शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

यंदाच्या अर्थसंकल्पात मला काय दिले रे भाऊ ? कामगार, महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष; शेतकरी, व्यापाऱ्यांची पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:15 IST

budget 2021 : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे. त्यामुळे भांडवलदारांचेही व गरिबांसाठी कोणताही बदल झाला नसल्याचे या अर्थसंकल्पातून दृष्टीस पडत आहे. त्यामुळे बजेटने मला काय दिले, असा सूरही सर्वसामान्यांतून उमटत आहे. काही राज्यांची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याने इतर राज्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र महागाईचा सामना आता करावा लागणार आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याची पुनरावृत्ती झाली आहे. कमाल आश्वासने किमान कामगार तर महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे आर्थिक सर्वेक्षणात बेरोजगारीबद्दल कोणतीही स्पष्टता आढळत नाही.  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे घर चालविणे आता तारेवरची कसरत झाली आहे. भाजीपाल्यासह इतर वस्तूंवरील भाववाढ झाल्याने आम्हा गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. - निहा राऊत, गृहिणीयंदाच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गासाठी मात्र कोणतीही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरून १० कोटी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.                   - राकेश जैन, दुकानदारआज सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्याच योजना, मोठमोठ्या घोषणा आणि आकडे फेकण्यापलीकडे काहीही नवे नाही. केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली.                - अक्षय म्हात्रे, रिक्षाचालकशिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटींकची, कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ३ हजार कोटींकच्या तरतुदीमुळे ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत होण्यास मदत होईल.                          - ॲड. अंकित बंगेरायुवकांना रोजगार निर्मितीसाठी अधिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणे गरजेचे होते. यामुळे निराधारांना आधार मिळणे शक्य झाले असते, तर बेरोजगारी हटविण्यासाठी लघु उद्योगांना उभारी देण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणे गरजेचे होते.         - साहील सय्यद, युवककोरोनामुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास किमान २-३ वर्षे लागतील, त्यामुळे राज्यांचे आर्थिक गणित बिघडू नये, यासाठी पुढील २ ते ३ वर्षे जीएसटी भरपाईचा कालावधी वाढवून देणे गरजेचे होते.          - परेश गजने, शेतकरीशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विकासदर ११ टक्के असला पाहिजे. पण, आज तो फक्त २ टक्के आहे, त्यामुळे ही घोषणादेखील पोकळ आणि फसवी आहे.            - जयश्री पाटील, भाजी विक्रेते कोविड व्हॅक्सिनसाठी चांगली तरतूद केली आहे. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेमुळे आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील. नवीन हाॅस्पिटल सुरू करण्यासाठी तरतूद आहे.                            -डाॅ. अर्चना सिंहपाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या घोषणेमुळे सामान्य माणसाला या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला असून, बँक खात्यात असलेल्या रकमेला ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच दिला आहे.         - विक्रम शेठ, पेट्रोलपंप चालकचांगल्या याेजना राबविण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामध्ये जलजीवन मिशनचा समावेश आहे. त्यामुळे घराेघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य हाेणार .                             - हर्षदा म्हात्रे-मयेकर, गृहिणी बसस्थानककोरोनाचा फटका बसल्याने अर्थव्यवस्था रुळावर येण्यास किमान २-३ वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यांचे आर्थिक गणित बिघडू नये, यासाठी किमान पुढील २ ते ३ वर्षे जीएसटी भरपाईचा कालावधी वाढवून देण्याबाबतही अर्थमंत्र्यांनी विचार करायला हवा होता.  बाजारपेठेत चर्चाइंधनाची दरवाढ म्हणजे महागाईला दिलेले आमंत्रण आहे, तर दुसरीकडे कार्पोरेट सेक्टरला अधिक महत्त्व दिले असल्याने ग्राहक आणि दुकानदार यांच्यात काही प्रमाणात दरी निर्माण होणार आहे. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021Raigadरायगड