शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

यंदाच्या अर्थसंकल्पात मला काय दिले रे भाऊ ? कामगार, महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष; शेतकरी, व्यापाऱ्यांची पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:15 IST

budget 2021 : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे. त्यामुळे भांडवलदारांचेही व गरिबांसाठी कोणताही बदल झाला नसल्याचे या अर्थसंकल्पातून दृष्टीस पडत आहे. त्यामुळे बजेटने मला काय दिले, असा सूरही सर्वसामान्यांतून उमटत आहे. काही राज्यांची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याने इतर राज्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र महागाईचा सामना आता करावा लागणार आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याची पुनरावृत्ती झाली आहे. कमाल आश्वासने किमान कामगार तर महिला सबलीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे आर्थिक सर्वेक्षणात बेरोजगारीबद्दल कोणतीही स्पष्टता आढळत नाही.  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे घर चालविणे आता तारेवरची कसरत झाली आहे. भाजीपाल्यासह इतर वस्तूंवरील भाववाढ झाल्याने आम्हा गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. - निहा राऊत, गृहिणीयंदाच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गासाठी मात्र कोणतीही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरून १० कोटी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.                   - राकेश जैन, दुकानदारआज सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्याच योजना, मोठमोठ्या घोषणा आणि आकडे फेकण्यापलीकडे काहीही नवे नाही. केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली.                - अक्षय म्हात्रे, रिक्षाचालकशिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटींकची, कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ३ हजार कोटींकच्या तरतुदीमुळे ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत होण्यास मदत होईल.                          - ॲड. अंकित बंगेरायुवकांना रोजगार निर्मितीसाठी अधिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणे गरजेचे होते. यामुळे निराधारांना आधार मिळणे शक्य झाले असते, तर बेरोजगारी हटविण्यासाठी लघु उद्योगांना उभारी देण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणे गरजेचे होते.         - साहील सय्यद, युवककोरोनामुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास किमान २-३ वर्षे लागतील, त्यामुळे राज्यांचे आर्थिक गणित बिघडू नये, यासाठी पुढील २ ते ३ वर्षे जीएसटी भरपाईचा कालावधी वाढवून देणे गरजेचे होते.          - परेश गजने, शेतकरीशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विकासदर ११ टक्के असला पाहिजे. पण, आज तो फक्त २ टक्के आहे, त्यामुळे ही घोषणादेखील पोकळ आणि फसवी आहे.            - जयश्री पाटील, भाजी विक्रेते कोविड व्हॅक्सिनसाठी चांगली तरतूद केली आहे. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेमुळे आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील. नवीन हाॅस्पिटल सुरू करण्यासाठी तरतूद आहे.                            -डाॅ. अर्चना सिंहपाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या घोषणेमुळे सामान्य माणसाला या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला असून, बँक खात्यात असलेल्या रकमेला ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच दिला आहे.         - विक्रम शेठ, पेट्रोलपंप चालकचांगल्या याेजना राबविण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामध्ये जलजीवन मिशनचा समावेश आहे. त्यामुळे घराेघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य हाेणार .                             - हर्षदा म्हात्रे-मयेकर, गृहिणी बसस्थानककोरोनाचा फटका बसल्याने अर्थव्यवस्था रुळावर येण्यास किमान २-३ वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यांचे आर्थिक गणित बिघडू नये, यासाठी किमान पुढील २ ते ३ वर्षे जीएसटी भरपाईचा कालावधी वाढवून देण्याबाबतही अर्थमंत्र्यांनी विचार करायला हवा होता.  बाजारपेठेत चर्चाइंधनाची दरवाढ म्हणजे महागाईला दिलेले आमंत्रण आहे, तर दुसरीकडे कार्पोरेट सेक्टरला अधिक महत्त्व दिले असल्याने ग्राहक आणि दुकानदार यांच्यात काही प्रमाणात दरी निर्माण होणार आहे. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021Raigadरायगड