शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
6
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
7
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
8
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
9
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
10
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
11
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
13
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
14
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
15
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
16
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
17
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
18
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
19
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
20
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

पनवेलकरांना विहिरींचा आधार, पाण्यासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 03:17 IST

डिसेंबरमध्येच पनवेलकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

- वैभव गायकरपनवेल : डिसेंबरमध्येच पनवेलकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. कपडे व इतर कामांसाठी या पाण्याचा वापर केला जात असून, शहरातील सर्व विहिरींची साफसफाई करून त्या पाण्याचा योग्य वापर करण्याची मागणी होत आहे.राज्यातील स्वत:च्या मालकीचे धरण बांधणारी पनवेल ही पहिली नगरपालिक होती. १५० वर्षांपूर्वी तेव्हाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाणीपुरवठा योजनांचे उत्तम नियोजन केले होते. देहरंग धरण १९४८ मध्ये बांधून शहराला पाणी पुरविण्याची सोय केली होती. याशिवाय वडाळे, कृष्णाळे, देवाळे, लेंडाळे, विश्राळे व डुंडाळे तलावांमधील पाण्याचा वापर केला जात होता. याशिवाय शहरांमधील विहिरींचाही योग्य वापर केला जात होता. दुर्बेबाग बागेतील व खांदे विहीर योजना तेव्हा सुरू होती. नंतर शहर वाढत गेले; परंतु गरजेप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. शहरामधील विहिरींचाही योग्य वापर करण्यात आला नाही. सद्यस्थितीमध्ये पनवेल शहरामध्ये वर्षभर पाणी असलेल्या २५ पेक्षा जास्त विहिरी आहेत. संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ही संख्या अजून जास्त आहे. यापूर्वी विहिरींमधील गाळ काढण्याकडे व स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आले. परंतु सद्यस्थितीमध्ये याच विहिरी पनवेलकरांसाठी आधार ठरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. काही ठिकाणी अनेक दिवसांपासून पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. नागरिकांनी आतापर्यंत अडगळीत पडलेल्या विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून विहिरींवर पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी गर्दी वाढली आहे. विहिरींमधील गाळ बाजूला करून त्या पाण्याचा वापर केला जात आहे. या विहिरींचा गाळ काढून त्या स्वच्छ केल्या असत्या तर शहरवासीयांना त्याचा लाभ झाला असता, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.पनवेलमध्ये यापूर्वीच्या दुष्काळी स्थितीमध्ये तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने विहिरींमधील पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. विहिरींची साफसफाईही केली होती. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये पाणीटंचाईचे पडसाद उमटले. महापालिका क्षेत्रातील बोरचे सर्वेक्षण करून त्या पाण्याचा वापर करण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली. याच पद्धतीने महापालिका कार्यक्षेत्रामधील विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करावे व नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.पाणीचोरी प्रकरणी दोघांवर गुन्हेपनवेल महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर येणारी पाइपलाइन फोडून त्यातील पाण्याची चोरी करून जारने पाणीविक्र ी करणाऱ्या दोन आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित दत्तात्रेय वारदे (३८, पनवेल ), रमेश मंगल दिवाकर (३२, पनवेल) अशी आरोपींची नावे आहेत. अमित वारदे व रमेश दिवाकर यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या महापालिकेच्या पाइपलाइनमधून पाणीचोरी केली आहे. पाइपलाइनला छिद्र पाडून या छिद्रातून पाणी मोटारच्या साहाय्याने ओढून काही मीटर अंतरावर खेचले जात असे. येथून पाणीचोरी करून पनवेल तालुक्यातील देवीचा पाडा, शिरवली, चिंध्रण या भागात या बेकायदा मिनरल वॉटर प्लाण्टमधून पाणी विकले जात असल्याची माहिती देण्यात आली. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली होती. शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय घुमे करत आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड