शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

पनवेलकरांना विहिरींचा आधार, पाण्यासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 03:17 IST

डिसेंबरमध्येच पनवेलकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

- वैभव गायकरपनवेल : डिसेंबरमध्येच पनवेलकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. कपडे व इतर कामांसाठी या पाण्याचा वापर केला जात असून, शहरातील सर्व विहिरींची साफसफाई करून त्या पाण्याचा योग्य वापर करण्याची मागणी होत आहे.राज्यातील स्वत:च्या मालकीचे धरण बांधणारी पनवेल ही पहिली नगरपालिक होती. १५० वर्षांपूर्वी तेव्हाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाणीपुरवठा योजनांचे उत्तम नियोजन केले होते. देहरंग धरण १९४८ मध्ये बांधून शहराला पाणी पुरविण्याची सोय केली होती. याशिवाय वडाळे, कृष्णाळे, देवाळे, लेंडाळे, विश्राळे व डुंडाळे तलावांमधील पाण्याचा वापर केला जात होता. याशिवाय शहरांमधील विहिरींचाही योग्य वापर केला जात होता. दुर्बेबाग बागेतील व खांदे विहीर योजना तेव्हा सुरू होती. नंतर शहर वाढत गेले; परंतु गरजेप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. शहरामधील विहिरींचाही योग्य वापर करण्यात आला नाही. सद्यस्थितीमध्ये पनवेल शहरामध्ये वर्षभर पाणी असलेल्या २५ पेक्षा जास्त विहिरी आहेत. संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ही संख्या अजून जास्त आहे. यापूर्वी विहिरींमधील गाळ काढण्याकडे व स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आले. परंतु सद्यस्थितीमध्ये याच विहिरी पनवेलकरांसाठी आधार ठरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. काही ठिकाणी अनेक दिवसांपासून पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. नागरिकांनी आतापर्यंत अडगळीत पडलेल्या विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून विहिरींवर पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी गर्दी वाढली आहे. विहिरींमधील गाळ बाजूला करून त्या पाण्याचा वापर केला जात आहे. या विहिरींचा गाळ काढून त्या स्वच्छ केल्या असत्या तर शहरवासीयांना त्याचा लाभ झाला असता, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.पनवेलमध्ये यापूर्वीच्या दुष्काळी स्थितीमध्ये तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने विहिरींमधील पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. विहिरींची साफसफाईही केली होती. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये पाणीटंचाईचे पडसाद उमटले. महापालिका क्षेत्रातील बोरचे सर्वेक्षण करून त्या पाण्याचा वापर करण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली. याच पद्धतीने महापालिका कार्यक्षेत्रामधील विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करावे व नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.पाणीचोरी प्रकरणी दोघांवर गुन्हेपनवेल महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर येणारी पाइपलाइन फोडून त्यातील पाण्याची चोरी करून जारने पाणीविक्र ी करणाऱ्या दोन आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित दत्तात्रेय वारदे (३८, पनवेल ), रमेश मंगल दिवाकर (३२, पनवेल) अशी आरोपींची नावे आहेत. अमित वारदे व रमेश दिवाकर यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या महापालिकेच्या पाइपलाइनमधून पाणीचोरी केली आहे. पाइपलाइनला छिद्र पाडून या छिद्रातून पाणी मोटारच्या साहाय्याने ओढून काही मीटर अंतरावर खेचले जात असे. येथून पाणीचोरी करून पनवेल तालुक्यातील देवीचा पाडा, शिरवली, चिंध्रण या भागात या बेकायदा मिनरल वॉटर प्लाण्टमधून पाणी विकले जात असल्याची माहिती देण्यात आली. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली होती. शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय घुमे करत आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड