शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत, सरपंचांना अटीमध्ये बांधण्याबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 07:09 IST

Raigad : सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय रणधुमाळीने ग्रामीण भाग पुरता ढवळून निघत आहे.

रायगड : जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी राेजी हाेत आहेत. नवीन नियमांनुसार आता सरपंचपदाचे आरक्षण निवडणुका उरकल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे घाेडेबाजाराला आळा बसणार आहे. मात्र, सातत्याने सरपंचांनाच अटींमध्ये का बांधले जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय रणधुमाळीने ग्रामीण भाग पुरता ढवळून निघत आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुका पार पडल्यानंतर जाहीर हाेणार असल्याने या निर्णयाचे काही सरपंचांनी स्वागत केले आहे, तर काहींना हा निर्णय पटलेला नाही. आता सरपंचपदासाठी घाेडेबाजार हाेणार नाही, काेणालाही निवडणूक लढवता येणार आहे. ज्या दिवशी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार हाेते, त्याच दिवशी सरकारचानिर्णय आल्याने प्रशासनाला आरक्षणाची साेडत रद्द करावी लागली हाेती. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक ८८ आरक्षण आता निवडणुका पार पडल्यानंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे घाेडेबाजार थांबण्यास मदत मिळणार आहे. पैशांच्या अपव्ययाला लगाम बसणार आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. सरकार नेहमीच विविध प्रयाेग करताना सरपंचांनाच टार्गेट करते हे चुकीचे आहे.    - दिग्विजय पाटील, सरपंच, पेढांबे

सरपंचपदासाठी आरक्षण निवडणुका पार पडल्यावर काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. सामान्याला निवडणूक लढवता येणार आहे. ज्यांना निर्णय पटलेला नाही त्यांना मात्र निर्णयाचा त्रास हाेणारच आहे.    - श्रीदास म्हात्रे, सरपंच, पेझारी

काय म्हणणे?सरपंच हा ग्रामीण राजकीय, सामाजिक विकासातील महत्त्वाचा घटक आहे. दरवेळी निर्णय बदलण्यात येतात. सरपंचांनाच विविध अटी आहेत. हे थांबवणे गरजेचे आहे.

सरपंच सेवा संघाचे म्हणणे काय?सरकारने याेग्य ताेच निर्णय घेतला आहे. मात्र कधी थेट सरपंच निवडून आणण्याचे जाहीर केले जाते, कधी वेगळाच निर्णय घेण्यात येताे. सरकार बदलले की साेयीस्करपणे निर्णय बदलण्यात येतात. हे काेठे तरी थांबले पाहिजे.

टॅग्स :Raigadरायगड