शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

#Welcome2018: जिल्ह्यात १० लाख पर्यटक होणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 07:55 IST

ख्रिसमसला किनारपट्टीत आलेल्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत आणि जल्लोषाकरिता किमान दहा लाख पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

अलिबाग : नववर्ष स्वागताकरिता जिल्ह्यात येणा-या पर्यटकांच्या सुरक्षिततेकरिता तसेच वाहतूक कोंडीत त्यांना अडकून राहावे लागू नये, याकरिता जिल्ह्यातून जाणा-या गोवा राष्ट्रीय महामार्गासह राज्य व जिल्हा मार्गावर जिल्हाधिकारी डॉ. अनिल विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशान्वये अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू झाल्याने, स्वत:च्या चारचाकी वाहनातून रायगडच्या सागरपट्टीत येणा-या पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होण्याची शक्यता किनारपट्टीतील हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. ख्रिसमसला किनारपट्टीत आलेल्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत आणि जल्लोषाकरिता किमान दहा लाख पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.संभाव्य दहा लाख पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर पर्यटक व स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षेसाठी तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीसठाण्यांच्या हद्दीत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जिल्ह्यातील नियमित पोलीस बळाव्यतिरिक्त अतिरिक्त ३०० पोलिसांची नियुक्ती बंदोबस्ताकरिता करण्यात आली आहे.विशेषत: मुंबई-गोवा महामार्ग, अलिबागसह किनारी भागातील मार्गावर वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी चेकपोस्टवर बंदोबस्त नेमण्यात आला असून वेळोवेळी वाहनांची तपासणी व नाकाबंदी करण्यात येणार आहे.गर्दीच्या ठिकाणी व अलिबाग, नागाव, मुरु ड, दिघी सागरी पो.स्टे.च्या हद्दीत समुद्रकिनारी व गर्दीच्या ठिकाणी बिट मार्शल व दामिनी पथकाची विशेष पेट्रोलिंग नेमण्यात आली आहे. याशिवाय विविध संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट, तसेच नियंत्रण कक्ष पी.सी.आर. मोबाइल पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे.सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन बोटी समुद्रामध्ये पेट्रोलिंगसाठी ठेवण्यात आल्या असून, सागरी गस्ती प्रभावी करण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर रोजी मद्य पिऊन वाहन चालवणाºया तळीरामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, ठिकठिकाणी बे्रथ अ‍ॅनालायझरचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाºयांवर कठोर कारवाईचे आदेश सर्व पोलीसठाण्यांना देण्यात आले आहेत. पर्यटकांनी ३१ डिसेंबर रोजी आपल्यामुळे दुसºयाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, सुरक्षितपणे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे, असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.>रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारेपर्यटकांनी गजबजलेबोर्ली मांडला : सलग जोडून आलेल्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी मुरु डमध्ये पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. अलिबाग आणि मुरु ड तालुक्यातील वरसोली, किहीम, नागाव, काशिद, बारशिव, बोर्ली, नांदगाव, मुरु ड आदी ठिकाणच्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्समध्ये बुकिंग फुल्ल झाली आहेत. येथे बीच फेस्टिव्हल व मुरु डच्या पर्यटनस्थळांना समुद्रकिनारी भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षी ‘थर्टी फर्स्ट’चा दिवस रविवार असल्याने या दिवसाचा पुरेपूर आनंद लुटला जाणार आहे. थर्टी फर्स्टची होणारी गर्दी पाहता हॉटेल व घरगुती जेवण बनविणाºयांना अगोदरच आॅर्डर देण्यात आली आहे. नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीही तयारीला लागली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून मुरु ड तालुक्यातील मुरु ड-आगरदांडापर्यंत पसरलेल्या किनारपट्टीवरील अनेक गावांमधून डोंगरउतारावर अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. आॅनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध असल्याने या वेळी मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेतला आहे. यामुळे काशिद हे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे.

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017