शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रायगडमध्ये आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या अर्थचक्राला गती, १३३ वर्षांची परंपरा टिकून

By निखिल म्हात्रे | Updated: January 8, 2023 18:26 IST

आठवडा बाजार संस्कृतीने स्थानिक व्यापाऱ्यांची अर्थचक्र सुधारले असून, दिवसाला लाखो रुपयांची उलढाल या आठवडा बाजारातून होत आहे.

अलिबाग - मॉल व साखळी दुकाने संस्कृतीमुळे आठवडा बाजारांवर परिणाम झाल्याचे बोलले जात असले तरी रायगड जिल्ह्यातील आठवडा बाजार आजही दिमाखात भरत आहेत. विशेष म्हणजे शहरात राहणाऱ्यांनामध्येही या बाजाराची ओढ आजही दिसून येत आहे. मॉलमध्ये नाही मिळत, पण आठवडा बाजारात मिळते, अशा भावना आजही शहरवासीय व्यक्त करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील आठवडा बाजारांना १३३ वर्षांची परंपरा आहे. मॉल संस्कृतीमुळे काही बाजार बंद पडले असले तरी नव्याने सुरूही होत आहेत. आठवडा बाजार संस्कृतीने स्थानिक व्यापाऱ्यांची अर्थचक्र सुधारले असून, दिवसाला लाखो रुपयांची उलढाल या आठवडा बाजारातून होत आहे.

आठवडा बाजारांमध्ये मॅलच्या दरापेक्षाही कमी दरात मिळणारे कपडे, कडधान्य, याशिवाय कांदे, बटाटे, घरगुती पद्धतीचे मसाले, पापड, लोणची, प्लॅस्टिकची भांडी यासह आठवडा बाजारात असलेल्या अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात.

१३३ वर्षांची परंपरा

१३३ वर्षांची आठवडा बाजारांना परंपरा आहे. १८८३ मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, वदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी आणि महाड तालुक्यात महाडला आठवडा बाजार भरण्यास प्रारंभ झाला. तत्कालीन मुरुड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडे बाजार भरत असे. १८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा आठवडा बाजार भरत असे.

पोयनाड मोठी बाजारपेठ

अलिबाग तालुक्यातील पोयनाड ही एक मोठी दैनिक बाजारपेठ आजही सुप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे दर सोमवारी मोठा आठवडा बाजारही भरतो. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रेते आणि १ हजार खरेदीदार येत असत, तर हटाळे - नागावच्या आठवडे बाजारात प्रांरभीच्या काळात १५ विक्रेते व आता १००० खरेदीदार येत असत. वायशेत येथील आठवडा बाजारात नित्याने स्थानिकांसह पर्यटकही हजेरी लावतात.

खरेदीची मौज

जिल्ह्यात भरणाऱ्या आठवडा बाजारांपैकी अनेक बाजार हे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी आहेत. तर अनेक बाजार सागरीकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने येथे पर्यटक आवर्जून थांबतात. मॉलच्या तुलनेत आठवडे बाजारात घासाघीस करून माल खरेदी करण्याची मजा काही ओरच असल्याचे पिंपरी-चिंचवड येथून आलेले आणि हाटाळे-नागावच्या आठवडे बाजारात खरेदी करणारे उदय पारसनीस यांनी सांगितले.

मातीशी नाते

मॉलमध्ये जे मिळत नाही ते या आठवडा बाजारात मिळते. मातीशी नेमके नाते सांगणारा हा बाजार गावाच्या वातावरणाचा आनंद देतो, अशी प्रतिक्रिया मूळच्या अलिबागच्या असल्या तरी सध्या वरळी येथे वास्तव्यास असणाऱ्या साक्षी राणे यांनी दिली.

शेतकऱ्यांना चार पैसै मिळाल्याचा आनंद

शेतकऱ्याच्या हातून तांदूळ, नारळ, वाल, चणे आदी जीवनोपयोगी वस्तू थेट विकत घेताना आनंद आणि समाधान मिळते. शिवाय दलालांऐवजी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा जास्त मोबदला मिळत असल्याने दोन पैसे जास्त देण्याची तयारीही यावेळी असल्याचे अंधेरी येथे राहणाऱ्या लीना जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड