शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारामुळे व्यावसायिकांवर परिणाम; भाव स्थिर ठेवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:18 IST

तळ्यात बाजार बंद करण्याची स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी : भाव स्थिर ठेवण्याची गरज

तळा : तळा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होत असून, तळा शहरातील आठवडी बाजार बंद करण्याची मागणी बाजारपेठेतील स्थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. 

दर बुधवारी तळा बसस्थानकाशेजारी भरणाऱ्या आठवडी बाजारात बहुतांश व्यापारी हे बाहेरून येऊन आपली दुकाने बाजारपेठेत थाटतात, त्यामुळे सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांमुळे तळा शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

खेड्यापाड्यातील नागरिक फक्त आठवडी बाजारालाच येत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी उसळते. यामुळे एखादा कोरोनाबाधित रुग्ण संपर्कात आल्यास प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे, तसेच बुधवारी नागरिक आठवडाभराची खरेदी करीत असल्याने बाकी सहा दिवस बाजारपेठेत शुकशुकाट असतो. परिणामी स्थानिक व्यापारावर याचा परिणाम होतो. त्यामुळे दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे, तर दुसरी बाजू लक्षात घेता नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारा माल दुकानांपेक्षा आठवडा बाजारात कमी दरात मिळतो, त्यामुळे ग्राहकांना भावात तफावत जाणवत असल्याने नाइलाजाने त्यांना बाजारात माल खरेदी करावा लागत आहे.  स्थानिक व्यापाऱ्यांनी जर आपल्या मालाचे भाव स्थिर ठेवले तर ग्राहक आठवडी बाजाराकडे वळणारच नाहीत असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :Raigadरायगड