शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी व्हावीः राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 16:20 IST

शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार.

महाडः दिवाळी, गणपती किंवा सगळेच प्रमुख सण आपण तिथीनुसार साजरे करतो. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही तारखेनुसार नव्हे; तर तिथीनुसार साजरी व्हायला हवी, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली अस्मिता आहे, आपली ओळख आहे. ते महाराष्ट्राचे आराध्य दैवतच आहेत. खरं तर, त्याची जयंती ३६५ दिवस साजरी करायला हवी, त्यांचं स्मरण रोजच करायला हवं, असंही त्यांनी नमूद केलं. 

शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार. त्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपूर्वी मी जयंत साळगावकरांना भेटलो होतो. शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नाही, तर तो आपला सण आहे. त्यामुळे तो तिथीनुसार साजरा व्हायला हवा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, असं राज म्हणाले. 

मनसेच्या नवनिर्माणाचं ध्येय समोर ठेवून राज ठाकरे राज्याचा दौरा करताहेत. त्या दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवप्रेमींनी त्यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळी, महाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या गड-किल्ल्यांचं जतन-संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८