शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वांजळे येथील ‘मदगड’ नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:13 IST

श्रीवर्धन तालुक्यातील ऐतिहासिक वनदुर्ग : रहिवाशांकडून दुरवस्था झालेल्या गडाची उपेक्षा थांबवण्याची मागणी

- गणेश प्रभाळ 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथील ऐतिहासिक वनदुर्ग मदगड किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व विभागाकडून आजतागायत दुर्लक्षितच राहिला आहे. या गडाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोजक्याच येणाऱ्या पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील ऐतिहासिक अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर असून या गडाची होणारी उपेक्षा थांबावी, यासाठी या गडाकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

तालुक्यामध्ये वेगवेगळी ठिकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय झाली आहेत, त्यातील एक आहे मदगड हा किल्ला छत्रपतींच्या अमलाखाली असल्याची शक्यता बोलण्यात येते. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर गड सिद्दींच्या ताब्यात गेला; पण मराठ्यांनी जून १७३३ मध्ये मदगड परत स्वराज्यात आणला. बोर्ली वांजळे मार्गावर ५ किमी अंतरावर मदगड आहे. सन १७३५ च्या पत्राप्रमाणे मराठे व सिद्दी यांच्यामधील लढाईच्या प्रसंगात मदगडची संरक्षण व्यवस्था पेशव्यांनी वाढवली होती, आता गडावर घनदाट झाडी झुडपे वाढली आहेत. ही सगळी वनौषधी आहेत. झाडाझुडपांमुळे गडावरील अवशेष दिसून येत नाहीत. पाण्याची टाकी, घरांची जोती व त्यांची चिरे आढळतात. मदगडावरून श्रीवर्धन, दिघी, दिवेआगर, हिम्मतगड हे पाहू शकतो. हा किल्ला १७ व्या शतकात सिद्दीच्या ताब्यात असताना श्रीमंत रमाबाई पेशवे इ. स. १७७२ मध्ये देवदर्शनासाठी आल्या असताना मदगडवरून तोफांची सलामी दिली गेली, तसेच हत्तीवरून नजराणा पाठविला होता, असा संदर्भ आढळतो.

मदगडाच्या पायथ्याशी वांजळे गाव आहे. वांजळे गावापर्यंत पक्का गाडी रस्ता आहे. हा संपूर्ण प्रदेश डोंगरदºयांनी व्याप्त असल्याने चारही बाजूंनी हिरवळ या ठिकाणाच्या सौंदर्यात भर पाडतात. यामुळे प्रवास आनंदमय होतो. गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे दुर्गमित्रांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. गडावरील दाट झाडी व हिंस्र प्राण्याचे भय यामुळे अवशेषांची शोधयात्रा करणे कमालीचे कठीण आहे. मदगडावर फारसे दुर्गमित्र जात नसल्याने गडाविषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नाही. गडाबाबतचे ऐतिहासिक मोजकेच संदर्भ व हरवलेले दुर्गावशेष यांचे संकलन करून मदगडाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्याची गरज असून याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.मदगडचे शिवकालीन संदर्भ नाहीतच्चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो. दिवेआगरहून बोर्लीच्या मागच्या मदगडच्या डोंगरावरून वांजळे मार्गे पायवाटेने म्हसळ्याकडे रस्ता जातो. त्याच्या अलीकडे उजवीकडे फुटणारी पायवाट मदगडाकडे नेते. आता इथे फारसे काही शिल्लक नसले तरी सभोवतालचा मोठा परिसर इथून दिसतो. बोर्लीपंचतनला जाऊन गाडीमार्गाने वांजळे येथून मदगड माथ्यावर तासाभरात पोहोचता येते. मदगडची उंची २९२ मी. आहे. माथ्यावरून दिवेआगरचा समुद्रकिनारा दिसतो. मदगडला मतगड असे संबोधतात. मदगडचे शिवकालीन संदर्भ नाहीत; पण बाणकोटच्या खाडीपासून म्हसळे खाडीपर्यंत पसरलेल्या सागरी किनाºयापर्यंत व त्यालगतच्या प्रांतातील एकमेव गड असल्याने टेहळणीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. 

गड-किल्ल्यांची अवस्था सध्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गड-किल्ले वाचवण्यासाठी विविध संघटनेतर्फे दुर्गसंवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बोर्लीपंचतन येथील आम्ही युवक यामध्ये सहभागी होत गेली सात वर्षे मदगड येथे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवत आहोत. गडाविषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नसल्याने संशोधनाची गरज आहे.- नंदकिशोर भाटकर,दुर्गप्रेमी, बोर्लीपंचतन