शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

धबधबे बनले मृत्यूचा सापळा, निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:53 IST

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

- मयूर तांबडेपनवेल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. २०११ पासून तब्बल १७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पर्यटनाच्या नावाखाली मद्यपींचा गोंधळ वाढू लागला असल्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.पावसाळा सुरू झाला की पनवेल तालुक्यातील नद्या व धबधबे पर्यटकांना खुणावू लागतात. गाढी नदीच्या परिसरामध्ये शनिवार व रविवारी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. गाढेश्वर धरण, गाढी नदी, मोरबे धरण, नदी परिसराला प्रथम पसंती दिली जाते. परंतु या परिसरातील पर्यटनस्थळाकडे रायगड जिल्हा प्रशासन व वनविभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. धबधबे व नदीपात्रामध्ये नागरिक गर्दी करत असलेल्या ठिकाणी कोणत्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटक मनमानीपणे धबधब्यामध्ये व नदीमध्ये उतरतात व अपघात होवून अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. पहिल्याच पावसामध्ये गाढेश्वर धरण हाऊसफुल्ल होते. पाऊस वाढला की नदीचा प्रवाह अचानक वाढतो. पर्यटकांना पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नाही व पाण्यात उतरलेले अनेकजण वाहून जातात. प्रत्येक वर्षी तीन ते चार जणांना जीव गमवावा लागत आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून २०११ पासून तब्बल १६ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांश अपघात सुरक्षेविषयीच्या निष्काळजीपणामुळे झाले असल्याचे उघड झाले आहे.पावसाळी पर्यटनासाठी पनवेल परिसरामध्ये कौटुंबिक सहलीचे प्रमाण जास्त आहे. परंतु काही वर्षांमध्ये मद्यपी तरुणांचा वावर या परिसरामध्ये वाढला आहे. नदी व धबधब्याच्या परिसरामध्ये उघड्यावर मद्यपान करून गोंधळ घालत असल्याने कुटुंबीयांसह येणाऱ्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. यामुळे पोलिसांनी परिसरामध्ये धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असला तरी पोलिसांची नजर चुकवून नदी व धबधबा परिसराकडे प्रत्येक रविवारी हजारो पर्यटक जात आहेत. अपघात होवून कोणाचा मृत्यू होवू नये यासाठी पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले जात आहे. पर्यटकांना सूचना देण्यासाठीचे फलक विविध ठिकाणी लावले आहेत.गाढेश्वरसह नेरे परिसरामध्ये लावलेल्या सूचनामाथेरान परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे नदीमधील पाण्याचा प्रवाह कमी जास्त होत असून बुडून मृत्यू होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे पर्यटकांनी योग्य काळजी घ्यावी.गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पाणीपुरवठा होत असतो यामुळे धरणात खाद्यपदार्थ व इतर वस्तू टाकून पात्र दूषित करू नयेलहान मुले व स्त्रियांसह ज्यांना पोहता येत नाही त्यांनी नदीपात्रामध्ये उतरू नयेअमली पदार्थ, दारू व तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई असून मद्यपान किंवा मादक पदार्थांचे सेवन करताना कोणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.हा परिसर डोंगराळ असून रस्ते अरुंद आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका जाण्यास खुला असणे आवश्यक असल्यामुळे रोडच्या कडेला वाहने उभी करू नयेत.वर्षा सहलीसाठी येणाºया पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, नशा करून वाहन चालवू नयेगाढेश्वर धरण, मोरबे धरण, बढी कुंडी धरण परिसर कलम १४४ प्रमाणे पावसाळी पर्यटनासाठी प्रतिबंधित करण्यात आला असून या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात येईलपनवेल परिसरामध्ये बुडून मृत्यू झालेल्यांचा तपशीलदिनांक नाव ठिकाण१३ जून २०११ श्याम वानखेडे (अमरावती) बढीकुंडी धबधबा१३ जून २०११ रणजीत गावकर - चेंबूर गाढी नदी४ जुलै २०११ अनोळखी व्यक्ती -२५ जुलै २०१२ किरण कानू जाडे - ठाणा नाका बढीकुंडी धबधबा२७ जून २०१३ खगेंद्र सिंग बुढाल- नवी मुंबई गाढी नदी१४ जुलै २०१३ विश्वास घरत - उरण गाढी नदी२८ जुलै २०१३ सुलक्षण सोनावणे - नेरूळ शांतीवन नेरे१९ सप्टेंबर २०१३ दत्तात्रय पाठक - विहिघर गाढी नदी, कोप्रोली१९ सप्टेंबर २०१४ अनोळखी व्यक्ती कासाडी नदी३१ जुलै २०१६ राहुल डोंबले- कामोठे धोदाणी धबधबा१६ सप्टेंबर २०१६ विजय सुदाम गायकवाड- नेरे हलडोली, गाढी नदी२४ सप्टेंबर २०१६ प्रेमाबाई चांगा पाटील गाढी नदी३ डिसेंबर २०१६ गणेश बारकू देशेकर - चिंध्रण कासाडी नदी२६ जून २०१६ दीपक मोहन खडूू - खार, मुंबई गाढी नदी२६ जून २०१६ किशोर मोतीराम चामुट गाढी नदीनागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी या परिसरात मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी देखील या परिसरात येणे टाळावे.- अशोक राजपूत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,तालुका पोलीस ठाणे

टॅग्स :Raigadरायगड