शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

दासगाव, वहूर परिसरातील गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:29 IST

२० दिवसांपासून पाणीसमस्या : स्थानिकांसह प्रा. आरोग्य केंद्रातील रु ग्ण, कर्मचाऱ्यांचे हाल

- सिकंदर अनवारे 

दासगाव : कोथुर्डे धरणातील पाण्यावर दासगाव आणि वहूर परिसरात पाणीपुरवठा केला जातो. कोथुर्डे धरणातील पाणी गांधारी नदीत सोडले जाते. हे पाणी जॅकवेलच्या साहाय्याने मोहोप्रे येथे उचलले जाते. येथून हे पाणी दासगाव-वहूर नळपाणी पुरवठा योजनेला जाते. महाड नाते परिसरातील आणि खाडीपट्टा विभागातील दासगाव-वहूर या परिसरातील गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बांधकामांकरिता हे पाणी लघू पाटबंधारे विभागाने रोखले आहे, यामुळे या परिसरातील गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे स्थानिकांसह दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्ण आणि कर्मचाºयांचे हाल झाले आहेत.

गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बंधाºयांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लघू पाटबंधाºयातील अधिकाºयांना हाताशी धरून हे काम पूर्ण करण्यासाठी पाणी सोडणे रोखले गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. यामुळे नाते परिसरातील गावांचा आणि खाडीपट्टा विभागातील गावात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दासगावसह केंबुर्ली, गांधारपाले, वहूर, टोळ या गावांतील पाणीपुरवठा बंद आहे.

दासगावमधील पत्रा शेडमधील नागरिकांची विहीर महामार्ग चौपदरीकरणात बाधित झाल्याने या पाणीपुरवठा योजनेवरच या लोकांना निर्भर राहावे लागत आहे. मात्र, हा पाणीपुरवठाही ठप्प झाल्याने येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.पाण्यासाठी टँकरची व्यवस्थाच्दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही पर्यायी व्यवस्था नसल्याने दासगाव-वहूर पाणीपुरवठा योजनेचेच पाणी वापरले जाते. या ठिकाणीदेखील पाणी न आल्याने येथील कर्मचाºयांना पाणी आणण्यासाठी बादली हातात घेऊन फिरावे लागले.च्पाणी न आल्याने येथे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही पाणी मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रु ग्णांना या समस्येला तोंड द्यावे लागले.च्येथील परिस्थितीपासून वहूर येथील सरपंच जितेंद्र बैकर यांनी त्यांच्या स्वखर्चातून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पाण्याचे दोन टँकर देऊन पाणीपुरवठा केला. 

गांधारी नदीत पाणी सोडले नसल्याने दासगाव-वहूर नळ पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा झाला नाही. गांधारी नदीत होत असलेल्या बंधाºयाच्या कामासाठी हे पाणी सोडले गेले नव्हते, अशी माहिती मिळताच पाहणी करून पाणी सोडण्याचे सांगण्यात आले, त्यानंतर पाणी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे गावात लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल.- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगावप्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या पाण्याचे हाल आहेत. या ठिकाणी असलेल्या कर्मचारी वसाहतीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, शिवाय रु ग्णांना पाणी देण्याकरिताही बाहेरून पाणी आणावे लागत आहे.- डॉ. मनाली मोरे,वैद्यकीय अधिकारी, दासगाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाई