शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दासगाव, वहूर परिसरातील गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:29 IST

२० दिवसांपासून पाणीसमस्या : स्थानिकांसह प्रा. आरोग्य केंद्रातील रु ग्ण, कर्मचाऱ्यांचे हाल

- सिकंदर अनवारे 

दासगाव : कोथुर्डे धरणातील पाण्यावर दासगाव आणि वहूर परिसरात पाणीपुरवठा केला जातो. कोथुर्डे धरणातील पाणी गांधारी नदीत सोडले जाते. हे पाणी जॅकवेलच्या साहाय्याने मोहोप्रे येथे उचलले जाते. येथून हे पाणी दासगाव-वहूर नळपाणी पुरवठा योजनेला जाते. महाड नाते परिसरातील आणि खाडीपट्टा विभागातील दासगाव-वहूर या परिसरातील गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बांधकामांकरिता हे पाणी लघू पाटबंधारे विभागाने रोखले आहे, यामुळे या परिसरातील गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे स्थानिकांसह दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्ण आणि कर्मचाºयांचे हाल झाले आहेत.

गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बंधाºयांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लघू पाटबंधाºयातील अधिकाºयांना हाताशी धरून हे काम पूर्ण करण्यासाठी पाणी सोडणे रोखले गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. यामुळे नाते परिसरातील गावांचा आणि खाडीपट्टा विभागातील गावात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दासगावसह केंबुर्ली, गांधारपाले, वहूर, टोळ या गावांतील पाणीपुरवठा बंद आहे.

दासगावमधील पत्रा शेडमधील नागरिकांची विहीर महामार्ग चौपदरीकरणात बाधित झाल्याने या पाणीपुरवठा योजनेवरच या लोकांना निर्भर राहावे लागत आहे. मात्र, हा पाणीपुरवठाही ठप्प झाल्याने येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.पाण्यासाठी टँकरची व्यवस्थाच्दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही पर्यायी व्यवस्था नसल्याने दासगाव-वहूर पाणीपुरवठा योजनेचेच पाणी वापरले जाते. या ठिकाणीदेखील पाणी न आल्याने येथील कर्मचाºयांना पाणी आणण्यासाठी बादली हातात घेऊन फिरावे लागले.च्पाणी न आल्याने येथे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही पाणी मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रु ग्णांना या समस्येला तोंड द्यावे लागले.च्येथील परिस्थितीपासून वहूर येथील सरपंच जितेंद्र बैकर यांनी त्यांच्या स्वखर्चातून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पाण्याचे दोन टँकर देऊन पाणीपुरवठा केला. 

गांधारी नदीत पाणी सोडले नसल्याने दासगाव-वहूर नळ पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा झाला नाही. गांधारी नदीत होत असलेल्या बंधाºयाच्या कामासाठी हे पाणी सोडले गेले नव्हते, अशी माहिती मिळताच पाहणी करून पाणी सोडण्याचे सांगण्यात आले, त्यानंतर पाणी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे गावात लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल.- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगावप्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या पाण्याचे हाल आहेत. या ठिकाणी असलेल्या कर्मचारी वसाहतीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, शिवाय रु ग्णांना पाणी देण्याकरिताही बाहेरून पाणी आणावे लागत आहे.- डॉ. मनाली मोरे,वैद्यकीय अधिकारी, दासगाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाई