शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

श्रीवर्धन शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, रानवली धरणाने गाठला तळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:24 IST

या वर्षी हवामानातील बदल व समुद्री वादळे यामुळे पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. पयार्याने श्रीवर्धन तालुक्याला दुष्काळाची धग सोसावी लागत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : या वर्षी हवामानातील बदल व समुद्री वादळे यामुळे पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. पयार्याने श्रीवर्धन तालुक्याला दुष्काळाची धग सोसावी लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, या धरणाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे.आजमितीस रानवली धरणातील पाणीसाठा ०.१३१ द. ल. घ. मी. शिल्लक आहे. त्यामुळे श्रीवर्धन नगरपरिषदेकडून एक दिवसाआड पाणी शहरातील नागरिकांना उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पेयजलाव्यतिरिक्त इतर पाण्यासाठी नैसर्गिक पारंपरिक जलस्रोत हातपंप, विहिरी, बोअरवेल याचा वापर करावा लागत आहे. श्रीवर्धन शहराची आजची लोकसंख्या १५२०० च्या जवळपास आहे. श्रीवर्धन नगरपालिकेच्या हद्दीतील नवी पेठ, मोहल्ला शिवाजी चौक, वाणी आळी, पेशवे आळी, महेश्वर पाखाडी, दाबक पाखाडी, जीवनेश्वर पाखाडी, विठ्ठल आळी या सर्व भागांत नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा केला जातो.रानवली धरणातील पाणीसाठा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत समाप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला पेयजलासाठी टँकरव्यतिरिक्त दुसरा पर्याय उपलब्ध नाही. कारण शहरातील विहिरीमध्ये क्षारांचे प्रमाण आमूलाग्र आहे. क्षारयुक्त पाणी आरोग्यासाठी धोकादायक आहे. नगरपरिषदेच्या समोर पेयजलच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. त्यामुळे कोकणातील पाऊस लांबणीवर पडल्यास श्रीवर्धन तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर रूप धारण करू शकतो.श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी वादशेतवावे, (बोर्ली) कोंडेपंचतन, नागलोली या गावांना टँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तसेच साक्षी भैरी (हरिहरेश्वर), गुलधे, बापवली, आदगाव, कासारकोंड येथील टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. तालुक्यात १२ विंधण विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, त्यापैकी तीन पूर्ण झाल्या आहेत तर एक व्यर्थ गेली आहे.कारविणे व कारविणे कोंडा जवळच्या विंधण विहिरी बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्णत्वास जातील या पद्धतीने काम चालू आहे. हरिहरेश्वरला एका खासगी बोअरवेलची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.श्रीवर्धन नगरपरिषद पाणीप्रश्नी सजग आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची रानवली धरणाची क्षमता आहे. तसेच आगामी काळात पाणीप्रश्न गंभीर बनून जनतेला त्रास होणार नाही, त्यासाठी टँकरचा प्रस्ताव तयार आहे. जनतेने नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे.- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, श्रीवर्धनश्रीवर्धन तालुक्यातील जनतेला पेयजलाच त्रास होणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी तालुका प्रशासनाने घेतली आहे. प्रशासनाकडे टँकर संदर्भात आलेल्या मागणीनुसार तत्काळ कार्यवाही करण्यात आली. टँकर, बोअरवेलची तरतूद प्रशासनाने केली आहे.- बाळासाहेब भोगे, गटविकास अधिकारी, श्रीवर्धनयावर्षी पडलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम पर्यटन व्यवसायावर काही प्रमाणात जाणवत आहे. श्रीवर्धन शहरातील लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा करण्याचे दायित्व नगरपरिषद प्रशासन यशस्वीपणे पार पाडत आहे. जनतेच्या पाणीप्रश्नी नगरपरिषद प्रशासन तत्पर आहे.- वसंत यादव, पर्यटन सभापती, नगरपरिषद, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगडwater shortageपाणीटंचाई