शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

श्रीवर्धन शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, रानवली धरणाने गाठला तळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:24 IST

या वर्षी हवामानातील बदल व समुद्री वादळे यामुळे पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. पयार्याने श्रीवर्धन तालुक्याला दुष्काळाची धग सोसावी लागत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : या वर्षी हवामानातील बदल व समुद्री वादळे यामुळे पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. पयार्याने श्रीवर्धन तालुक्याला दुष्काळाची धग सोसावी लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, या धरणाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे.आजमितीस रानवली धरणातील पाणीसाठा ०.१३१ द. ल. घ. मी. शिल्लक आहे. त्यामुळे श्रीवर्धन नगरपरिषदेकडून एक दिवसाआड पाणी शहरातील नागरिकांना उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पेयजलाव्यतिरिक्त इतर पाण्यासाठी नैसर्गिक पारंपरिक जलस्रोत हातपंप, विहिरी, बोअरवेल याचा वापर करावा लागत आहे. श्रीवर्धन शहराची आजची लोकसंख्या १५२०० च्या जवळपास आहे. श्रीवर्धन नगरपालिकेच्या हद्दीतील नवी पेठ, मोहल्ला शिवाजी चौक, वाणी आळी, पेशवे आळी, महेश्वर पाखाडी, दाबक पाखाडी, जीवनेश्वर पाखाडी, विठ्ठल आळी या सर्व भागांत नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा केला जातो.रानवली धरणातील पाणीसाठा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत समाप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला पेयजलासाठी टँकरव्यतिरिक्त दुसरा पर्याय उपलब्ध नाही. कारण शहरातील विहिरीमध्ये क्षारांचे प्रमाण आमूलाग्र आहे. क्षारयुक्त पाणी आरोग्यासाठी धोकादायक आहे. नगरपरिषदेच्या समोर पेयजलच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. त्यामुळे कोकणातील पाऊस लांबणीवर पडल्यास श्रीवर्धन तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर रूप धारण करू शकतो.श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी वादशेतवावे, (बोर्ली) कोंडेपंचतन, नागलोली या गावांना टँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तसेच साक्षी भैरी (हरिहरेश्वर), गुलधे, बापवली, आदगाव, कासारकोंड येथील टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. तालुक्यात १२ विंधण विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, त्यापैकी तीन पूर्ण झाल्या आहेत तर एक व्यर्थ गेली आहे.कारविणे व कारविणे कोंडा जवळच्या विंधण विहिरी बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्णत्वास जातील या पद्धतीने काम चालू आहे. हरिहरेश्वरला एका खासगी बोअरवेलची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.श्रीवर्धन नगरपरिषद पाणीप्रश्नी सजग आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची रानवली धरणाची क्षमता आहे. तसेच आगामी काळात पाणीप्रश्न गंभीर बनून जनतेला त्रास होणार नाही, त्यासाठी टँकरचा प्रस्ताव तयार आहे. जनतेने नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे.- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, श्रीवर्धनश्रीवर्धन तालुक्यातील जनतेला पेयजलाच त्रास होणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी तालुका प्रशासनाने घेतली आहे. प्रशासनाकडे टँकर संदर्भात आलेल्या मागणीनुसार तत्काळ कार्यवाही करण्यात आली. टँकर, बोअरवेलची तरतूद प्रशासनाने केली आहे.- बाळासाहेब भोगे, गटविकास अधिकारी, श्रीवर्धनयावर्षी पडलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम पर्यटन व्यवसायावर काही प्रमाणात जाणवत आहे. श्रीवर्धन शहरातील लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा करण्याचे दायित्व नगरपरिषद प्रशासन यशस्वीपणे पार पाडत आहे. जनतेच्या पाणीप्रश्नी नगरपरिषद प्रशासन तत्पर आहे.- वसंत यादव, पर्यटन सभापती, नगरपरिषद, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगडwater shortageपाणीटंचाई