शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाणीपुरवठा योजनांना निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:44 IST

पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. परंतु निधी मिळत नसल्याने या योजना रखडल्या आहेत. जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या या योजना पूर्ण करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्यात गिरवले, खैरवाडी, अकुळवाडी, गुळसुंदे, कोळखे, सोमटणे, पोसरी, नितळस, कर्नाळा, शिरढोण, नेवाळी, देवळोली, चिंध्रण या १३ गावांमध्ये लाखो रु पये खर्च करून राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. यातील नेवाळी, देवळोली, चिंध्रण, खैरवाडी, अकुळवाडी, सोमटणे, पोसरी येथील योजनांचे काम अर्धवट असून देखील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर गिरवले, गुळसुंदे, कोळखे, नितळस, कर्नाळा, शिरढोण येथील पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.या १३ गावातील प्रत्येक योजनेला ४ ते५ वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नळ पाणी योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही. १३ गावातील योजनेसाठी अंदाजपत्रकीय ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रु पये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख ६४ हजार रु पये खर्च करण्यात आले आहेत. तर या योजना पूर्ण करण्यासाठी अद्यापही ५ कोटी ६८ लाख ५४ हजार रु पयांच्या निधीची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्याचे मोठ्याप्रमाणात शहरीकरण होवू लागले आहे. तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावे नैना प्रकल्पाचा घटक झाली आहेत. भविष्यात देशातील सर्वाधिक गुंतवणूक पनवेल तालुक्यात होणार आहे. निवासी व औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वर्तमान स्थितीमध्ये पाणी हीच सर्वात गंभीर समस्या आहे. भविष्यात ही स्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुक्त पनवेल तालुका करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. रखडलेल्या योजना वेगाने मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी होवू लागली आहे.गावनिहाय पाणीपुरवठा योजनेचा तपशीलनिधीअभावी पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. या कामांसाठी आवश्यक निधी मिळाला की कामे पूर्ववत सुरू करून पूर्ण केली जातील.- आर. डी. चव्हाण,उपअभियंता पाणीपुरवठा विभागच्१३ जलकुंभासाठी ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख रुपये खर्च झाले असून कामे पूर्ण करण्यासाठी५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या