शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

पाणीपुरवठा योजनांना निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:44 IST

पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. परंतु निधी मिळत नसल्याने या योजना रखडल्या आहेत. जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या या योजना पूर्ण करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्यात गिरवले, खैरवाडी, अकुळवाडी, गुळसुंदे, कोळखे, सोमटणे, पोसरी, नितळस, कर्नाळा, शिरढोण, नेवाळी, देवळोली, चिंध्रण या १३ गावांमध्ये लाखो रु पये खर्च करून राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. यातील नेवाळी, देवळोली, चिंध्रण, खैरवाडी, अकुळवाडी, सोमटणे, पोसरी येथील योजनांचे काम अर्धवट असून देखील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर गिरवले, गुळसुंदे, कोळखे, नितळस, कर्नाळा, शिरढोण येथील पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.या १३ गावातील प्रत्येक योजनेला ४ ते५ वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नळ पाणी योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही. १३ गावातील योजनेसाठी अंदाजपत्रकीय ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रु पये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख ६४ हजार रु पये खर्च करण्यात आले आहेत. तर या योजना पूर्ण करण्यासाठी अद्यापही ५ कोटी ६८ लाख ५४ हजार रु पयांच्या निधीची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्याचे मोठ्याप्रमाणात शहरीकरण होवू लागले आहे. तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावे नैना प्रकल्पाचा घटक झाली आहेत. भविष्यात देशातील सर्वाधिक गुंतवणूक पनवेल तालुक्यात होणार आहे. निवासी व औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वर्तमान स्थितीमध्ये पाणी हीच सर्वात गंभीर समस्या आहे. भविष्यात ही स्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुक्त पनवेल तालुका करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. रखडलेल्या योजना वेगाने मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी होवू लागली आहे.गावनिहाय पाणीपुरवठा योजनेचा तपशीलनिधीअभावी पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. या कामांसाठी आवश्यक निधी मिळाला की कामे पूर्ववत सुरू करून पूर्ण केली जातील.- आर. डी. चव्हाण,उपअभियंता पाणीपुरवठा विभागच्१३ जलकुंभासाठी ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख रुपये खर्च झाले असून कामे पूर्ण करण्यासाठी५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या