शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रायगड जिल्ह्यातील जलसाठा गेल्या वर्षा पेक्षा या वर्षी घटला, ६०.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध

By निखिल म्हात्रे | Updated: February 19, 2024 20:34 IST

गेल्या वर्षी ७७.३२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रात पाणीसाठा घटला आहे गेल्या वर्षी याच महिन्यात २८ धरण क्षेत्रात या वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६०.२८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.तर मागील वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ७७.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. अजूनही पुढील पावसाळा सुरू होण्यासाठी चार महिने शिल्लक आहेत.

रायगड जिल्ह्यातील पाणीसाठा कमी होत असताना उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरून क्षेत्रात २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उसरण धरण क्षेत्रात सर्वाधिक ८१ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील दहा धरणात ५० टक्के पेक्षा कमी पाणी साठा उपलब्ध आहे.रायगड जिल्ह्यात रायगड पाटबंधारे विभाग अंतर्गत  २८ धरणे येत असून या २८ धरण क्षेत्राततील पाण्यासाठयामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध,तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतार वाडी धरण क्षेत्रात ७० टक्के पाणी साठा, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात ८० टक्के पाणी साठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरण क्षेत्रात ६२ टक्के पाणी साठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात ४५ टक्के पाणी साठा उपलब्ध, घोटवडे धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध, ढोकशेत धरणक्षेत्रात २० टक्के पाणी साठा उपलब्ध,कवेळे धरण क्षेत्रात ४७ टक्के पाणी साठा उपलब्ध,उन्हेरे धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ५८ टक्के पाणी साठा उपलब्ध, कुडकी धरण क्षेत्रात ७७ टक्के पाणी साठा उपलब्ध,रानीवली धरण क्षेत्रात ३९ टक्के पाणी साठा उपलब्ध,म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, संदेरी धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंद धरण क्षेत्रात ५४ टक्के पाणी साठा उपलब्ध, खिंडवाडी धरण क्षेत्रात ५७ टक्के पाणी साठा उपलब्ध, कोथुर्डे धरण क्षेत्रात ४६ टक्के पाणी साठा उपलब्ध, खैरे धरण क्षेत्रात ४५ टक्के पाणी साठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात ७१ टक्के पाणी साठा उपलब्ध,अवसरे धरण क्षेत्रात ५८ टक्के पाणी साठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणी साठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, डोणवत धरण क्षेत्रात ५७ टक्के पाणी साठा उपलब्ध,पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध,बामणोली धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणी साठा उपलब्ध, उसरण धरण क्षेत्रात ८१ टक्के पाणी साठा उपलब्ध,उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ४७ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात