शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कर्जत तालुक्यात दिवाळीत आदिवासी भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 05:07 IST

धाबेवाडी, बांगारवाडीमधील स्थिती : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

नेरळ : कर्जत तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थ आणि महिलांना दिवाळी त्रासदायक ठरली आहे. ऐन दिवाळीतच कर्जत तालुक्यातील धाबेवाडी आणि बांगारवाडी आदिवासीवाड्यांमध्ये महिलांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन गावांच्या मध्ये काही वर्षांपूर्वी विहीर शासनाच्या योजनेतून बांधण्यात आली. या विहिरीवर जाण्यासाठीचा मार्ग फार्महाउसच्या मालकांनी काही आश्वासनाच्या जोरावर ग्रामस्थांकडून अडवून ठेवला आहे. त्यामुळे अधिकच लांबून पाणी आणावे लागते. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना पाणी सहज आणणे शक्य होते.

विहिरींत डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत जेमतेम पाणी शिल्लक असते; पण त्यानंतर विहिरी पूर्ण आटून जातात. यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवड्यातून दोन वेळा वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील लोकप्रतिनिधी या आदिवासी बांधवांकडे लक्ष देत नसल्याने, आदिवासी सुविधांपासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्गाने याकडे लक्ष दिले तर पाण्याची समस्यासुटू शकते.पावसाळा संपल्यावर दोन महिन्यांतच विहिरीचे पाणी आटते. त्यानंतर आमच्या आदिवासी महिलांना डवऱ्याने पाणी पाणी भरावे लागते, दिवाळी असूनही आम्हाला डवºयानेच पाणी भरावे लागत आहे. आमच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.- मंजुळा गावंडा, महिला, बांगारवाडीधाबेवाडी येथून विहिरीवर जाण्यासाठी पूर्वीपासूनचा एक रस्ता आहे, बांगारवाडी आणि धाबेवाडी येथील ग्रामस्थ या रस्त्यावरून विहिरीवर जात होते. येथील जागा मुबंईच्या धनिकाने खरेदी केल्याने त्या मालकाने कंपाउंड टाकून रस्ता अडवला आणि वाडीमध्ये पाइप टाकून पाणी दिले जाईल, असे सांगितले; परंतु अद्याप पाइप टाकून दिले नाहीत.- तातू हिंदोळा, ग्रामस्थ, धाबेवाडी

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीKarjatकर्जत